शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांना हटवा!

By admin | Updated: June 25, 2014 01:16 IST

राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले

अहमदनगर :  राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असून त्याला गृहमंत्री आर.आर. पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांना हटविण्याची मागणी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत असून स्वत:च्या खात्यावर पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी तातडीने पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी दलवाई यांनी येथे केली. 
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार असून राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. खर्डा, सोनई, आष्टी, पुणो आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस तपासकामी निष्क्रिय झाले आहेत. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेशात शिक्षेचे प्रमाण अनुक्रमे 35 व 5क् टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आरशात पाहावा
शिर्डीच्या साईबाबांना सर्व समाज मानतो. त्यांचे जीवन विनयशील, सेवाभावी होते. सेवाभाव वृत्तीमुळेच त्यांनी संतत्व मिळविले. साईबाबांविषयी लोकभावना भडकाविणारे शंकराचार्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आधी आरशात पाहावा. वादग्रस्त वक्तव्याने त्यांचा समाजातील आदर कमी झाला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आकाश ठेंगणो झाले आहे, असे दलवाई म्हणाले.
 
अत्याचाराच्या घटनेनंतर उज्‍जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजीचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ्याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही, असे दलवाई म्हणाले.