शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गृहमंत्र्यांना हटवा!

By admin | Updated: June 25, 2014 01:16 IST

राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले

अहमदनगर :  राज्यातील दलित, मुस्लिमांवरील वाढत्या अत्याचारप्रकरणी वेगाने तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले असून त्याला गृहमंत्री आर.आर. पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांना हटविण्याची मागणी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासात पोलीस निष्क्रियता दाखवित आहेत. पोलिसांकडूनच आरोपींना संरक्षण मिळत असून स्वत:च्या खात्यावर पाटील यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी तातडीने पाटील यांना हटवून त्यांच्या जागी दुसरा सक्षम गृहमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी दलवाई यांनी येथे केली. 
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार असून राज्याचे गृहमंत्रीपद काँग्रेस घेणार आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हे कमी होणार नाहीत, असेही ते म्हणाले. खर्डा, सोनई, आष्टी, पुणो आदी ठिकाणी दलित, मुस्लिमांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस तपासकामी निष्क्रिय झाले आहेत. राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त अडीच टक्के आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेशात शिक्षेचे प्रमाण अनुक्रमे 35 व 5क् टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आरशात पाहावा
शिर्डीच्या साईबाबांना सर्व समाज मानतो. त्यांचे जीवन विनयशील, सेवाभावी होते. सेवाभाव वृत्तीमुळेच त्यांनी संतत्व मिळविले. साईबाबांविषयी लोकभावना भडकाविणारे शंकराचार्याचे वक्तव्य निषेधार्ह आहे. शंकराचार्यानी त्यांचा चेहरा आधी आरशात पाहावा. वादग्रस्त वक्तव्याने त्यांचा समाजातील आदर कमी झाला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांना आकाश ठेंगणो झाले आहे, असे दलवाई म्हणाले.
 
अत्याचाराच्या घटनेनंतर उज्‍जवल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते. खैरलांजीचा निकाल काय लागला, यावरून निकम यांची कार्यपद्धतीही संशयास्पद वाटते. त्यामुळे निकम यांची नियुक्ती या प्रकरणात करू नये. सगळ्याच गोष्टींना काही निकम हे एकमेव उत्तर नाही, असे दलवाई म्हणाले.