शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

उड्डाणाच्या विलंबाला परदेशीच जबाबदार

By admin | Updated: July 3, 2015 02:57 IST

एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांना पाठविलेल्या अहवालात मुंबई-नेवार्क उड्डाणाला झालेला उशीर हा केवळ ‘प्रवाशाची गैरसोय’ मुळे झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई : एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांना पाठविलेल्या अहवालात मुंबई-नेवार्क उड्डाणाला झालेला उशीर हा केवळ ‘प्रवाशाची गैरसोय’ मुळे झाल्याचे म्हटले आहे. उड्डाणाला कोणत्याही तांत्रिक कारणामुळे उशीर झालेला नसून फडणवीस यांनी आपल्या मुख्य सचिवांशिवाय प्रवास करायला नकार दिला होता. नागरी उड्डयन राज्यमंत्री महेश शर्मा हे उड्डाणाला झालेला उशीर हा तांत्रिक कारणांमुळेच असल्याचे बुधवार दुपारपर्यंत म्हणत होते. त्यांचे हे म्हणणे या अहवालाने खोडून काढले. शर्मा म्हणाले की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी व एअर इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे. हा अहवाल एअर इंडियाचे उप व्यवस्थापक संतोष फर्नांडिस यांनी सादर केला होता. आपल्या संपूर्ण शिष्टमंडळाशिवाय उड्डाण करायला फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्याशिवाय अन्य कोणतेही कारण उशिरासाठी नव्हते, असे या अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले होते की, एक तर ते त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळासह प्रवास करतील किंवा स्वत:सह इतर सगळे विमानातून खाली उतरतील. या अहवालात कोणत्याही तांत्रिक दोषाचा किंवा एटीसीशी संबंधित गोष्टींचा उल्लेख नाही. उशिराने झालेले उड्डाण हे केवळ ‘प्रवाशाची गैरसोय’ एवढ्या एकाच कारणाने झाले, असे त्यात म्हटले आहे.एअरलाईन्सने दोन वेगवेगळ््या विमानांतून त्यांच्या बॅगा खाली काढण्याचे काम सुरू करताच (हे काम खूप वेळ खाणारे असते) कोणीतरी परदेशी यांच्या घरून त्यांचा पासपोर्ट घेऊन तेथे आले. बॅगा, सामान खाली काढून घेऊन नवे सामान चढविण्यामुळे उड्डाणाला आणखी उशीर होणार होता त्यामुळे परदेशी यांना विमानात बसू देऊन मग उड्डाण करण्याचा निर्णय घेतला.विमानाचे उड्डाण २.३० वाजता होताच ड्युटीवरील व्यवस्थापकाने काही मिनिटांतच आपला अहवाल एअरलाईनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन, कार्यकारी संचालक (उत्तर व पश्चिम) आणि इंटरनॅशनल आॅपरेशन्स कंट्रोल सेलला पाठविला. परदेशी डेट्रॉईट येथून बुधवारी बोलताना, उशीर माझ्यामुळे झाला हे मान्यच करायला तयार नव्हते. मी २० मिनिटे उशिरा पोहोचलो. मी विमानातून उतरलोही. परंतु विमानाला उड्डाणाची परवानगी नव्हती. मला मग विमानात बसण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर विमानाने ४५ मिनिटांनी उड्डाण केले, असे परदेशी म्हणाले. (प्रतिनिधी)