शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

मुंबईत २५ टक्के विमानांना विलंब

By admin | Updated: May 11, 2016 03:57 IST

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही.

प्रमोद गवळी, नवी दिल्लीमागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे या विमान कंपनीचा ओटीपी आजदेखील ७९ टक्क्यांच्या वर नाही. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा ओटीपी त्यापेक्षाही कमी म्हणजे ७४.८ टक्के आहे.नागरी उड्डयण राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शर्मा बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘१ एप्रिल २०१५ पासून तर ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या काळात एयर इंडियाच्या नेटवर्कअंतर्गत एकूण १,५१,९९० उड्डाणे करण्यात आली. त्यात ३२,८४३ उड्डाणे अशी आहेत की, ज्यांची १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंबाने उड्डाण केले आहे. याच काळात मुंबईवरून २२,४०१ पैकी ५६०३ उड्डाणांना १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला होता.’विमान उड्डाणांमध्ये होणाऱ्या विलंबामागे ‘रिअ‍ॅक्शनरी’चे सर्वांत मोठे योगदान आहे. याचा अर्थ, आधी येणारे विमान उशिरा पोहोचले की, दुसऱ्या विमानाला विलंब होतो किंवा एखाद्या विमानाने उशिरा उड्डाण केले की, त्यानंतरच्या दुसऱ्या विमानाच्या उड्डाणासही उशीर होतो. धावपट्टी ०९/२७ ची घोषित क्षमता प्रतितास ४५ विमाने आवागमन आणि धावपट्टी १४/३२ ची घोषित क्षमता प्रतितास ३५ विमाने आवागमन एवढी आहे. संचालनासाठी एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर केला जाऊ शकतो,’ असे डॉ. शर्मा यांनी या वेळी सांगितले.>डॉ. शर्मा म्हणाले, ‘सर्व ए ३२० फॅमिली विमाने उड्डाणयोग्य आहेत. कारण अनुमोदित अनुसूची अथवा कार्यक्रमानुसार त्यांची देखभाल केली जाते. त्यामुळे या विमानांबाबत कसलीही समस्या नाही. एअर इंडियात १४ नवीन ‘ए ३२०’ विमाने खरेदी करण्याचा निर्णय एअर इंडिया बोर्डने नुकताच घेतलेला आहे.’