शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:16 IST

उच्च न्यायालय : राज्य सरकारवर व्यक्त केला संताप

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती देण्यास विलंब केल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन समिती नेमण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे - पाटील यांनी उच्च न्यायालयात सादर केली आहे. या याचिकेवरील गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळाशी सामना करण्याकरिता काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.२०१६च्या आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करण्यात यावे, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाचाही समावेश आहे, असे याचिकेत नमूद आहे. सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आठवडाभराची वेळ मागितली. ‘राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील परिस्थितीबाबत आम्हाला माहिती आहे. परिस्थितीचे गांभीर्य आम्ही जाणतो, असा संताप व्यक्त करीत राज्य सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब करू नये,’ असे न्यायालयाने म्हटले. मराठवाड्याला आठवड्यातून एकदा पाणी मिळते, ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.‘सहकार्य करणे थांबवू नये’न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला २७ मेपर्यंत मुदत देत म्हटले की, राज्य सरकार जर काही दुष्काळसदृश्य जिल्ह्यांना सहकार्य करीत असेल तर त्यांनी या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे म्हणून सहकार्य करणे थांबवू नये.