शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 06:16 IST

उच्च न्यायालय : राज्य सरकारवर व्यक्त केला संताप

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती देण्यास विलंब केल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला.

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र आपत्कालीन व्यवस्थापन समिती नेमण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे - पाटील यांनी उच्च न्यायालयात सादर केली आहे. या याचिकेवरील गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दुष्काळाशी सामना करण्याकरिता काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते.२०१६च्या आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करण्यात यावे, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाचाही समावेश आहे, असे याचिकेत नमूद आहे. सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास आठवडाभराची वेळ मागितली. ‘राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील परिस्थितीबाबत आम्हाला माहिती आहे. परिस्थितीचे गांभीर्य आम्ही जाणतो, असा संताप व्यक्त करीत राज्य सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब करू नये,’ असे न्यायालयाने म्हटले. मराठवाड्याला आठवड्यातून एकदा पाणी मिळते, ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.‘सहकार्य करणे थांबवू नये’न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला २७ मेपर्यंत मुदत देत म्हटले की, राज्य सरकार जर काही दुष्काळसदृश्य जिल्ह्यांना सहकार्य करीत असेल तर त्यांनी या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे म्हणून सहकार्य करणे थांबवू नये.