शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देहू पाणी योजनाप्रश्नी आज बैठकीत तोडगा?

By admin | Updated: March 6, 2017 01:16 IST

ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

देहूगाव : देहूगाव येथील पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. एन. भोई यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बैठकीबाबत कळविले असून बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देहूगावला गेल्या ४०-४५ वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र,पाणी बिल वसूल होत नाही, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ सहकार्य करीत नाहीत अशी तक्रार जीवन प्राधिकरणची होती. त्यामुळे ही योजना दुरुस्ती-देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत ती हस्तांतरीत करून घ्यावी, असा तगादा प्राधिकरणने ग्रामपंचायतीकडे लावला. ही योजना सध्याच्या लोकसंख्येला पुरेशी नसून या योजनेवर ताण येत आहे. जलवाहिन्या सर्वत्र टाकण्यात आलेल्या नाहीत. दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, नळजोड बंद असूनही त्यांना बिले येतात, अशा कारणांनी नागरिक बिल भरत नाहीत. दोन वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांच्या माध्यमातून नऊ कोटीच्या योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून द्यावी व ग्रामसभेचा ठराव घेऊन ही योजना ताब्यात घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ असे ग्रामपंचायतने कळविले होते. यावर प्राधिकरणने आक्षेप खोडून काढत योजना ताब्यात घेण्यासाठी दहा वेळा पत्रव्यवहार केला होता. (वार्ताहर)>जानेवारी महिन्यात योजना हस्तांतरणाबाबत ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यात चर्चा झाली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा, असे ठरले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने प्राधिकरणाने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा एकतर्फी बंद केला होता. यामुळे देहूकरांचे हाल झाले होते.