शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

देहू पाणी योजनाप्रश्नी आज बैठकीत तोडगा?

By admin | Updated: March 6, 2017 01:16 IST

ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

देहूगाव : देहूगाव येथील पाणीपुरवठा योजना हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. एन. भोई यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बैठकीबाबत कळविले असून बैठकीत नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देहूगावला गेल्या ४०-४५ वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र,पाणी बिल वसूल होत नाही, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ सहकार्य करीत नाहीत अशी तक्रार जीवन प्राधिकरणची होती. त्यामुळे ही योजना दुरुस्ती-देखभालीसाठी परवडत नसल्याचे कारण देत ती हस्तांतरीत करून घ्यावी, असा तगादा प्राधिकरणने ग्रामपंचायतीकडे लावला. ही योजना सध्याच्या लोकसंख्येला पुरेशी नसून या योजनेवर ताण येत आहे. जलवाहिन्या सर्वत्र टाकण्यात आलेल्या नाहीत. दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो, नळजोड बंद असूनही त्यांना बिले येतात, अशा कारणांनी नागरिक बिल भरत नाहीत. दोन वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांच्या माध्यमातून नऊ कोटीच्या योजनेचे काम सुरू आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून द्यावी व ग्रामसभेचा ठराव घेऊन ही योजना ताब्यात घ्यायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ असे ग्रामपंचायतने कळविले होते. यावर प्राधिकरणने आक्षेप खोडून काढत योजना ताब्यात घेण्यासाठी दहा वेळा पत्रव्यवहार केला होता. (वार्ताहर)>जानेवारी महिन्यात योजना हस्तांतरणाबाबत ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यात चर्चा झाली होती. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनंतर निर्णय घ्यावा, असे ठरले होते. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने प्राधिकरणाने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा एकतर्फी बंद केला होता. यामुळे देहूकरांचे हाल झाले होते.