शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सात जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये घट

By admin | Updated: May 6, 2016 02:13 IST

बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित

मुंबई : बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि जळगाव या सात जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेने शेतकरी आत्महत्या कमी झाल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिली. विदर्भातील सहा, मराठावाड्यातील आठ आणि सोलापूर अशा १६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महसूलमंत्री एकनाथ खडसे हे जळगाव येथून या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. जलयुक्त शिवार योजनेची कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने हातात हात घालून काम केल्यानेच आत्महत्या कमी होऊ शकल्या, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ८२ हजार अर्ज आलेले आहेत. या १६ जिल्ह्यांमध्ये त्यातील १३ हजार ६८० शेततळ्यांचे कार्यादेश देण्यात आले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी) सुधींद्र कुलकर्र्णींची उपस्थिती!- आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांची आजच्याबैठकीतील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. मराठवाड्यातील दुष्काळाचा अभ्यास करून तयार केलेला अहवाल या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. - ओआरएफ संस्थेच्या अहवालातील प्रमुख शिफारशी अशा - स्वतंत्र दुष्काळ निवारण खाते निर्माण करावे, दुष्काळ जागृती अभ्यासक्रम सुरू करावा, नद्यांच्या प्रवाहांचे मॅपिंग करा, दुष्काळाशी संबंधित पदांना प्रतिष्ठा द्यावी, दुष्काळासंबंधीची माहिती आॅनलाइन करा, आजवरच्या सर्व उपाययोजनांचे आॅडिट करावे, ग्राहक गट आणि शेतकरी गटांची स्थापना करावी आदी.