शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मलेरियाचा मृत्यूदर घटला

By admin | Updated: April 26, 2016 02:32 IST

पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात. २००९ मध्ये मुंबईत मलेरियाने थैमान घातले होते. मुंबईत मलेरियामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. पण २०१० ते २०१४ या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळाली. जागतिक मलेरिया दिनानिमित्त फॅमिली वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे (एफडब्लूटीआरसी) एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत डॉक्टर आणि या विषयातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ‘चांगल्यासाठी मलेरियाचा नाश करा’ या संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुंडे यांनी मुंबईतील मलेरियाची सद्य:स्थिती मांडली. डॉ. फुंडे यांनी सांगितले, की मलेरिया हा डासांमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका काम करीत आहे. २००९ मध्ये वाढलेल्या मलेरियांच्या रुग्णांमुळे पालिकेने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. २०१० मध्ये मुंबईत मलेरियामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये हे प्रमाण ५ वर आले आहे. त्यामुळे मुंबईत मलेरिया नियंत्रणात आणण्यास महापालिकेला यश आले आहे. या परिषदेला ‘एफडब्लूटीआरसी’चे (मुंबई) संचालक डॉ. दीपक राऊत यांनी कोलकाता, उत्तर पूर्वेकडील राज्यातील मलेरियाविषयीचे अनुभव सांगितले. केईएम रुग्णालयाचे डॉ. आर. आर. शिंदे यांनी मलेरियाविषयी परिपूर्ण संकल्पना विशद केली. समाजाच्या गरजेप्रमाणे मलेरियाविषयी वेगळा विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ‘डास उत्पत्तीक्षेत्र शोधक’ ही संकल्पना राजन नारिंग्रेकर यांनी सांगितली. (प्रतिनिधी)