शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियाचा मृत्यूदर घटला

By admin | Updated: April 26, 2016 02:32 IST

पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात. २००९ मध्ये मुंबईत मलेरियाने थैमान घातले होते. मुंबईत मलेरियामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. पण २०१० ते २०१४ या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळाली. जागतिक मलेरिया दिनानिमित्त फॅमिली वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे (एफडब्लूटीआरसी) एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत डॉक्टर आणि या विषयातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ‘चांगल्यासाठी मलेरियाचा नाश करा’ या संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुंडे यांनी मुंबईतील मलेरियाची सद्य:स्थिती मांडली. डॉ. फुंडे यांनी सांगितले, की मलेरिया हा डासांमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका काम करीत आहे. २००९ मध्ये वाढलेल्या मलेरियांच्या रुग्णांमुळे पालिकेने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. २०१० मध्ये मुंबईत मलेरियामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये हे प्रमाण ५ वर आले आहे. त्यामुळे मुंबईत मलेरिया नियंत्रणात आणण्यास महापालिकेला यश आले आहे. या परिषदेला ‘एफडब्लूटीआरसी’चे (मुंबई) संचालक डॉ. दीपक राऊत यांनी कोलकाता, उत्तर पूर्वेकडील राज्यातील मलेरियाविषयीचे अनुभव सांगितले. केईएम रुग्णालयाचे डॉ. आर. आर. शिंदे यांनी मलेरियाविषयी परिपूर्ण संकल्पना विशद केली. समाजाच्या गरजेप्रमाणे मलेरियाविषयी वेगळा विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ‘डास उत्पत्तीक्षेत्र शोधक’ ही संकल्पना राजन नारिंग्रेकर यांनी सांगितली. (प्रतिनिधी)