शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

By admin | Updated: February 27, 2017 00:13 IST

निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात किमान २०० याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांतील पराभूत उमेदवार व प्रतिनिधींच्या बैठकीत शनिवारी ठरविण्यात आले. यावेळी मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणीही करण्यात आली.महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने ९८ जागांवर विजय संपादन करीत घवघवीत यश मिळविले आहे. अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, ही मते मतदान यंत्रांतील घोळामुळे मिळाल्याचा आरोप अनेक पराभुत उमेदवारांकडून केला जात आहे. या मुद्यावर शनिवारी विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकत्र आले. यावेळी माजी आमदार बापु पठारे, नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, अ‍ॅड. रुपाली पाटील, सचिन भगत, धनंजय जाधव, विनायक हनमघर यांच्यासह दत्ता गायकवाड, विजय मारटकर, निलेश निकम, राम बोरकर, नारायण चव्हाण, सुधीर काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार तसेच मोठ्या संख्यने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाची पालिकेत एकहाती सत्ता आली आहे. पण त्यासाठी सत्तेचा गैरवापर करून मतदान यंत्रात मोठा घोळ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)