शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात

By admin | Updated: February 27, 2017 00:13 IST

निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : निवडणुकीमध्ये मतदान यंत्रामध्ये घोळ झाल्याचा आरोप करीत शहरातील काही पराभूत उमेदवारांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात किमान २०० याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांतील पराभूत उमेदवार व प्रतिनिधींच्या बैठकीत शनिवारी ठरविण्यात आले. यावेळी मतपत्रिकेवर फेरमतदानाची मागणीही करण्यात आली.महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाने ९८ जागांवर विजय संपादन करीत घवघवीत यश मिळविले आहे. अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, ही मते मतदान यंत्रांतील घोळामुळे मिळाल्याचा आरोप अनेक पराभुत उमेदवारांकडून केला जात आहे. या मुद्यावर शनिवारी विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकत्र आले. यावेळी माजी आमदार बापु पठारे, नगरसेवक दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, अ‍ॅड. रुपाली पाटील, सचिन भगत, धनंजय जाधव, विनायक हनमघर यांच्यासह दत्ता गायकवाड, विजय मारटकर, निलेश निकम, राम बोरकर, नारायण चव्हाण, सुधीर काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार तसेच मोठ्या संख्यने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपाची पालिकेत एकहाती सत्ता आली आहे. पण त्यासाठी सत्तेचा गैरवापर करून मतदान यंत्रात मोठा घोळ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)