शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

नकारात्मक प्रचारामुळे पराभव

By admin | Updated: October 26, 2014 00:16 IST

राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान

माणिकराव ठाकरे यांचा दावा : बंडखोरांना ‘नो एन्ट्री’नागपूर : राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान विधानसभेतही भाजपकडून राबविण्यात आले. या फसव्या प्रचाराने मतदारांना भुरळ घातली व त्यातून पराभव झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणमीमांसा केली. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे सांगत आपण अजूनही प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना होती. पण पक्ष म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका होती. राष्ट्रवादीने त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, असे सांगत आघाडी तुटण्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादीवर फोडले. काँग्रेसकडे बरेच सक्षम चेहरे आहेत. यापैकी एकाची लवकरच विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपला समर्थन देण्यात राष्ट्रवादीने उतावीळपणा दाखविल्यामुळे जनतेला राष्ट्रवादीबाबत शंका येऊ लागली आहे. काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध असून कुणीही भाजप-सेनेला समर्थन देणार नाही, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने जनतेला वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पाळतात का ते पाहू, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, तानाजी वनवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इव्हीएममध्ये गडबडीच्या तक्रारी काँग्रेसच्या उमेदवारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे केल्या आहेत. बऱ्याच उमेदवारांना अनेक बूथवर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. इतर पक्षांच्या उमेदवारांच्याही अशाच तक्रारी आहेत. ज्या बूथवर ९० टक्के मते मिळतील अशी अपेक्षा होती तेथे ३ ते ४ मते मिळाली आहेत. असे कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. राज्यभरात या विषयाची वेगाने चर्चा सुरू आहे. संबंधित उमेदवार व्यक्तिश: निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी करणार आहेत, असे सांगत प्रदेश काँग्रेसने अशी तक्रार करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ८ ला दिल्लीत बैठकपक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी २८ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठक बोलविली आहे. तीत पराभव झालेल्या सर्व राज्यातील प्रदेश अध्यक्षांसह प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, नेमणुका आदी विषयांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.