शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नकारात्मक प्रचारामुळे पराभव

By admin | Updated: October 26, 2014 00:16 IST

राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान

माणिकराव ठाकरे यांचा दावा : बंडखोरांना ‘नो एन्ट्री’नागपूर : राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान विधानसभेतही भाजपकडून राबविण्यात आले. या फसव्या प्रचाराने मतदारांना भुरळ घातली व त्यातून पराभव झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणमीमांसा केली. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे सांगत आपण अजूनही प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना होती. पण पक्ष म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका होती. राष्ट्रवादीने त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, असे सांगत आघाडी तुटण्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादीवर फोडले. काँग्रेसकडे बरेच सक्षम चेहरे आहेत. यापैकी एकाची लवकरच विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपला समर्थन देण्यात राष्ट्रवादीने उतावीळपणा दाखविल्यामुळे जनतेला राष्ट्रवादीबाबत शंका येऊ लागली आहे. काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध असून कुणीही भाजप-सेनेला समर्थन देणार नाही, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने जनतेला वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पाळतात का ते पाहू, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, तानाजी वनवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इव्हीएममध्ये गडबडीच्या तक्रारी काँग्रेसच्या उमेदवारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे केल्या आहेत. बऱ्याच उमेदवारांना अनेक बूथवर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. इतर पक्षांच्या उमेदवारांच्याही अशाच तक्रारी आहेत. ज्या बूथवर ९० टक्के मते मिळतील अशी अपेक्षा होती तेथे ३ ते ४ मते मिळाली आहेत. असे कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. राज्यभरात या विषयाची वेगाने चर्चा सुरू आहे. संबंधित उमेदवार व्यक्तिश: निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी करणार आहेत, असे सांगत प्रदेश काँग्रेसने अशी तक्रार करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ८ ला दिल्लीत बैठकपक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी २८ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठक बोलविली आहे. तीत पराभव झालेल्या सर्व राज्यातील प्रदेश अध्यक्षांसह प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, नेमणुका आदी विषयांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.