शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

नकारात्मक प्रचारामुळे पराभव

By admin | Updated: October 26, 2014 00:16 IST

राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान

माणिकराव ठाकरे यांचा दावा : बंडखोरांना ‘नो एन्ट्री’नागपूर : राज्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेले नकारात्मक प्रचाराचे अभियान विधानसभेतही भाजपकडून राबविण्यात आले. या फसव्या प्रचाराने मतदारांना भुरळ घातली व त्यातून पराभव झाला, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत पराभवाची कारणमीमांसा केली. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असे सांगत आपण अजूनही प्रदेशाध्यक्षपदी कायम असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले. स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना होती. पण पक्ष म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याची भूमिका होती. राष्ट्रवादीने त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही, असे सांगत आघाडी तुटण्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादीवर फोडले. काँग्रेसकडे बरेच सक्षम चेहरे आहेत. यापैकी एकाची लवकरच विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपला समर्थन देण्यात राष्ट्रवादीने उतावीळपणा दाखविल्यामुळे जनतेला राष्ट्रवादीबाबत शंका येऊ लागली आहे. काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध असून कुणीही भाजप-सेनेला समर्थन देणार नाही, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने जनतेला वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. आता ते आश्वासन पाळतात का ते पाहू, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, तानाजी वनवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इव्हीएममध्ये गडबडीच्या तक्रारी काँग्रेसच्या उमेदवारांनीही इव्हीएममध्ये गडबड असल्याच्या तक्रारी प्रदेश काँग्रेसकडे केल्या आहेत. बऱ्याच उमेदवारांना अनेक बूथवर अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. इतर पक्षांच्या उमेदवारांच्याही अशाच तक्रारी आहेत. ज्या बूथवर ९० टक्के मते मिळतील अशी अपेक्षा होती तेथे ३ ते ४ मते मिळाली आहेत. असे कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. राज्यभरात या विषयाची वेगाने चर्चा सुरू आहे. संबंधित उमेदवार व्यक्तिश: निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रारी करणार आहेत, असे सांगत प्रदेश काँग्रेसने अशी तक्रार करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ८ ला दिल्लीत बैठकपक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी २८ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथे बैठक बोलविली आहे. तीत पराभव झालेल्या सर्व राज्यातील प्रदेश अध्यक्षांसह प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, नेमणुका आदी विषयांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.