शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दीनदयाळ रोडवासींचाही रुंदीकरणाला विरोध!

By admin | Updated: November 2, 2016 03:28 IST

पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला

डोंबिवली : पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पश्चिमेतील पं. दिनदयाळ रोडवासीयांनाही रस्तारुंदीकरणाला विरोध केला आहे. या कारवाईविरोधात तेथील रहिवाशांनी नुकतीच स्वाक्षरी मोहीम राबवली. शहरविकासाच्या नावाखाली रहिवाशांना रस्त्यावर आणू पाहणाऱ्या केडीएमसी प्रशासनाचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला विश्वासात न घेता राबवली जाणारी मोहीम चुकीची आहे, असे मत पं. दिनदयाळ मार्ग रहिवाशी संघर्ष समितीने मांडले आहे.पश्चिमेतील द्वारका हॉटेल ते रेतीबंदर रोड हा पंडित दिनदयाळ मार्ग आहे. केडीएमसीने हाती घेतलेल्या रस्तारुंदीकरण मोहिमेत या रस्त्याचाही समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयाने या मार्गावरील अनेक निवासी बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात १८ इमारती व १४ बंगले आहेत. त्यामुळे ४८८ कुटुंबे व ८५ दुकाने असे अंदाजे तीन हजार नागरिक विस्थापित होतील, असा दावा रहिवाशी संघर्ष समितीचा आहे. १९९५-९६ मध्ये याच रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. त्यावेळी बाधित झालेले रहिवाशी आणि व्यापारी यांना अद्यापपर्यंत कोणताही मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे २०१२ मध्ये एका स्थानिक नागरिकाने कारवाईविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात केडीएमसीविरोधात दाखल केलेल्या दाव्यावर झालेल्या सुनावणीत या रस्त्याचे काम विकास आराखड्यानुसार पूर्ण झाले आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही पुन्हा त्याच मार्गावर रस्तारुंदीकरणाचा घाट घातला जात आहे, याकडे रहिवाशी संघर्ष समितीने लक्ष वेधले आहे. प्रभाग कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. जबरदस्तीने अन्यायकारक पद्धतीने रुंदीकरण रेटून नेण्याचा केडीएमसीचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. पूर्वेतील केळकर रोडवरील रहिवासी आणि दुकानदारांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता दिनदयाळ रोडवरील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शवल्याने ही मोहीम बारगळण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे रहिवाशांचे लक्ष आहे.>‘त्या’ बैठकीचे काय झाले?दिनदयाळ मार्गावरील रस्तारुंदीकरणात आनंदनगर प्रभागातील बांधकामेही बाधित होत आहेत. स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बाधितांची विशेष बैठक बुधवार २६ आॅक्टोबरला बोलावली होती. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात ही बैठक होणार होती. याबाबत संबंधितांना पत्रव्यवहारही करण्यात आले होते. परंतु, बैठक झाली नाही. याचे कारण गुलदस्त्यात असताना आता बाधित थेट आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेणार आहेत.