शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बिल्डरांच्या चुकीची शिक्षा सोसायट्यांना, ओसी नसली तरी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ मिळेल, मात्र पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:33 IST

भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसले तरी मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना मालकी देताना नियोजित आराखड्याच्या बाहेर जाऊन बिल्डरांनी किंवा फ्लॅट मालकांनी संबंधीत जागेत केलेल्या बेकायदेशीर बांधकामाची सगळी जबाबदारी आता सोसायटीवर येईल.

अतुल कुलकर्णी मुंबई : भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसले तरी मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांना मालकी देताना नियोजित आराखड्याच्या बाहेर जाऊन बिल्डरांनी किंवा फ्लॅट मालकांनी संबंधीत जागेत केलेल्या बेकायदेशीर बांधकामाची सगळी जबाबदारी आता सोसायटीवर येईल. परिणामी संबंधीत महापालिकांनी जर त्या सोसायट्यांना दंड लावला तर तोही त्यांनाच भरावा लागेल.एकट्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जवळपास ४० हजार सोसायट्यांना हा फटका बसेल. नागपूर, पुण्यातही यांची संख्या मोठी आहे. चोर सोडून संन्याश्याला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना जर पुर्नविकास करायचा असेल तर त्यांना ओसी घ्यावीच लागेल. त्यासाठी सदर इमारतीची व ती ज्या भूखंडावर उभी आहे त्याची संपूर्ण मालकी सोसायटीला मिळाली पाहिजे. जोपर्यंत ओसी मिळत नाही तोपर्यंत मालकी मिळत नव्हती. आता ज्या जागेवर सोसायटी उभी आहे त्या भूखंडाची मालकी सोसायटीला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र अशी मालकी मिळालेल्या सोसायट्यांना पुर्नविकास करायचा असेल तर महापालिकेकडून ओसी घ्यावीच लागेल. त्यानंतरच त्या सोसायट्यांना पुर्नविकासाचे अधिकार मिळतील.डीसी रुल्स नुसार बांधकाम न केलेल्या बिल्डरांना ओसी मिळाली नाही. त्यामुळे अनेक बिल्डरांनी ओसी न घेताच किंवा पार्टली ओसी घेऊन फ्लॅट विकून टाकले. पण ज्या जागेवर इमारत उभी तो भूखंड बिल्डरांच्याच मालकीचा राहीला. त्यामुळे पुर्नविकासात अडचणी येऊ लागल्या. म्हणून काँग्रेस सरकारने डिम्ड कन्व्हेयन्सची योजना २०११ मध्ये आणली होती. त्यात बदल करत भाजपा सरकारने हा निर्णय घेतला आहे.>बेकायदेशीर काम नियमित होईल?एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार जोपर्यंत ओसी मिळत नाही तोपर्यंत त्या जागेत रहायला जाता येत नाही. मात्र सरकारने आधीच ओसी न देता रहायला जाऊ दिले. आता ओसी नसताना मालकी हक्क प्रदान केले जातील त्यामुळे संबंधीत बिल्डरांनी जे काही बेकायदेशीर बांधकाम केले ते सगळे नियमित होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.बिल्डरच्या चुकीचा फटका फ्लॅटधारकांनाडिम्ड कन्व्हेयन्स मिळाले तरी मुळ बांधकाम बेकायदेशीर असेल तर संबंधीत महापालिका त्यांना ओसी देणार नाही. किंवा त्यासाठी जो काही दंड लावेल तो दंड भरण्याची जबाबदारी त्या सोसायट्यांवर येईल. मुळात बिल्डराच्या चुकीची शिक्षा फ्लॅट धारकांना का? अशा बिल्डरांकडून व्याजासह दंडाची वसुली केली तर भविष्यात बिल्डरांवर धाक राहील, अशी मागणी आता सोसायट्यांमधून होत आहे.