शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

दुष्काळामुळे साखर उत्पादनात घट

By admin | Updated: March 18, 2016 02:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेल्या दुष्काळाचे सावट साखरेच्या उत्पादनावर दिसू लागले आहे. यंदाच्या हंगामात मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७६ लाख टन

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात पडलेल्या दुष्काळाचे सावट साखरेच्या उत्पादनावर दिसू लागले आहे. यंदाच्या हंगामात मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७६ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी याच कालावधीत ८२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. जी यंदाच्या तुलनेत ६ लाख टनाने कमी आहे. जास्त पाण्यावर येणारे पिक म्हणून ऊस ओळखला जातो. मात्र गेल्या २ वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. गतवर्षी तर हे प्रमाण खूपच कमी होते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ऊसाच्या पिकावर पहायला मिळात आहे. गतवर्षी मार्चच्या मध्यापर्यंत ७३२ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते आणि त्यातून ८२ लाख टन साखरचे उत्पादन झाले. यंदा याच कालावधीत ६८२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून ११.१३ टक्के साखर उताऱ्याने ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.या हंगामात राज्यात सहकारी आणि खासगी असे १७७ साखर कारखाने गाळपासाठी सुरू करण्यात आले होते. त्यापैकी ८८ कारखान्यांचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण झाल्याने ते बंद करण्यात आले आहेत. नांदेड विभागातील २५ कारखाने, पुणे विभागातील ३३ कारखाने बंद झाले आहेत. औरंगाबाद, अहमदनगरमधील ५० टक्के कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूरमधील कारखान्यांचे गाळप अजूनही चालू आहे. तेथे ३८ कारखाने सुरू असून त्यापैकी केवळ एकाचेच गाळप पूर्ण झाले आहे. यंदाचा गाळप हंगाम जून महिन्यापर्यंत चालेल पण १५ एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखान्यांचे गाळप पूर्ण होण्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेतयंदाचा गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर पोहोचलेला असताना अजूनही ७८ लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. साखर आयुक्त कार्यालयाने काढलेल्या अंदाजावरून यावर्षी ७६० लाख टन ऊस गाळपासाठी येणार आहे. त्यापैकी ६८२ लाख टन ऊसाचे गाळप मार्चच्या मध्यापर्यंत झाले आहे.