शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 3, 2016 03:46 IST

दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना

ठाणे : दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र, त्या घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर होतेच, शिवाय यामध्ये केवळ कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाणच अधिक होते. दिवाळीच्या चार दिवसात शहरात आगीच्या २५ घटना घडल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ३३ घटना घडल्या होत्या.दिवाळीच्या काळात यंदा भिवंडीत एका कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत देखील आगीचा भडका उडाला होता. दुसरीकडे ठाण्यात मागील वर्षी दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत एका फोमच्या दुकानाला, उपवन येथे एका कंपनीला आणि इतर चार ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चार दिवसात आगीचे प्रमाण हे ३३ होते. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदादेखील आगीच्या घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या घटनांवर आळा बसविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विभाग त्या दृष्टीने सतर्क झाले होते. दरम्यान यंदा चार दिवसात आगीच्या केवळ २५ घटना घडल्या असल्या तरी कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण हे अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यामध्ये असलेल्या केबलला देखील आग लागल्याची घटना सावरकर नगर भागात घडली होती. ही एकच घटना वगळता इतर सर्व आगीच्या घटना या तुरळत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (प्रतिनिधी)गत वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने यंदा चोख व्यवस्था केली होती. आपत्ती आणि अग्निशमन विभागही सतर्क होते.