शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 3, 2016 03:46 IST

दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना

ठाणे : दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र, त्या घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर होतेच, शिवाय यामध्ये केवळ कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाणच अधिक होते. दिवाळीच्या चार दिवसात शहरात आगीच्या २५ घटना घडल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ३३ घटना घडल्या होत्या.दिवाळीच्या काळात यंदा भिवंडीत एका कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत देखील आगीचा भडका उडाला होता. दुसरीकडे ठाण्यात मागील वर्षी दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत एका फोमच्या दुकानाला, उपवन येथे एका कंपनीला आणि इतर चार ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चार दिवसात आगीचे प्रमाण हे ३३ होते. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदादेखील आगीच्या घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या घटनांवर आळा बसविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विभाग त्या दृष्टीने सतर्क झाले होते. दरम्यान यंदा चार दिवसात आगीच्या केवळ २५ घटना घडल्या असल्या तरी कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण हे अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यामध्ये असलेल्या केबलला देखील आग लागल्याची घटना सावरकर नगर भागात घडली होती. ही एकच घटना वगळता इतर सर्व आगीच्या घटना या तुरळत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (प्रतिनिधी)गत वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने यंदा चोख व्यवस्था केली होती. आपत्ती आणि अग्निशमन विभागही सतर्क होते.