शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 3, 2016 03:46 IST

दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना

ठाणे : दिवाळीच्या चार दिवसात एकीकडे नवी मुंबई, भिवंडीत मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र, त्या घडल्या असल्या तरी त्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर होतेच, शिवाय यामध्ये केवळ कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाणच अधिक होते. दिवाळीच्या चार दिवसात शहरात आगीच्या २५ घटना घडल्या आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ३३ घटना घडल्या होत्या.दिवाळीच्या काळात यंदा भिवंडीत एका कंपनीला मोठी आग लागल्याची घटना घडली. तर नवी मुंबईत देखील आगीचा भडका उडाला होता. दुसरीकडे ठाण्यात मागील वर्षी दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत एका फोमच्या दुकानाला, उपवन येथे एका कंपनीला आणि इतर चार ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षी चार दिवसात आगीचे प्रमाण हे ३३ होते. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदादेखील आगीच्या घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पालिकेने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या घटनांवर आळा बसविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे दोन्ही विभाग त्या दृष्टीने सतर्क झाले होते. दरम्यान यंदा चार दिवसात आगीच्या केवळ २५ घटना घडल्या असल्या तरी कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण हे अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यामध्ये असलेल्या केबलला देखील आग लागल्याची घटना सावरकर नगर भागात घडली होती. ही एकच घटना वगळता इतर सर्व आगीच्या घटना या तुरळत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. (प्रतिनिधी)गत वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने यंदा चोख व्यवस्था केली होती. आपत्ती आणि अग्निशमन विभागही सतर्क होते.