शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडण्याबाबत निर्णय राखीव

By admin | Updated: October 27, 2015 01:56 IST

नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी

मुंबई : नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर सोपवल्याने, उच्च न्यायालयाने सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. पाणी वाटपासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे प्राधिकरण गांभीर्याने पाहत नसल्याने, राज्य सरकारनेच आता हा विषय हाताळावा, असे संतप्त झालेल्या खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने पाणी वाटपावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे.मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) घेण्यापूर्वी राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्याला किती पाणी सोडायचे, यासंबंधी संपूर्ण माहिती मागवली होती. त्यानंतर १५ आॅक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाचा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला. सोमवारी सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने यासंबंधी प्राधिकरणावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. माहिती मागवली, तर निर्णय घेतलात का? फाईल दाखवा, असे निर्देश खंडपीठाने प्राधिकरणाला दिले. मात्र, अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची फाईल नव्हती, तसेच निर्णय घेतला की नाही, यावर प्राधिकरणाकडे काहीच ठोस उत्तरही नव्हते. त्यावर निर्णय घ्यायचा नव्हता तर माहिती का मागवली? असे शब्दांत खंडपीठाने फटकारले.प्राधिकरणावर ताशेरे ओढताना न्यायालयाने म्हटले की, ‘आमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्राधिकरणाने दिलेले नाही. पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या राज्यातील सर्वोच्च प्राधिकरणाकडून असे घडणे योग्य नाही. प्राधिकरणाकडे तज्ज्ञ मंडळी आहेत.’पाण्याचा प्रश्न पेटला असताना, त्यांनी पाणी वाटपाबाबत तातडीने निर्णय घेणे योग्य ठरले असते. मात्र, त्यांनी केवळ माहिती मागवली. कोणताही निर्णय घेतला नाही. इतका महत्त्वाचा प्रश्न प्राधिकरण गांभीर्याने का घेत नाही?, असे विचारत राज्य सरकारनेच आता या प्रकरणी लक्ष घालावे, अशा शब्दांत खंडपीठाने प्राधिकरणाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. (प्रतिनिधी)