शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

पाणी सोडण्याबाबत निर्णय राखीव

By admin | Updated: October 27, 2015 01:56 IST

नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी

मुंबई : नाशिक, अहमदनगर व मराठवाड्यात पाणी वाटपावरून वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच राज्य जलनियामक प्राधिकरणाने पाणी वाटपाची जबाबदारी गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर सोपवल्याने, उच्च न्यायालयाने सोमवारी प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. पाणी वाटपासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे प्राधिकरण गांभीर्याने पाहत नसल्याने, राज्य सरकारनेच आता हा विषय हाताळावा, असे संतप्त झालेल्या खंडपीठाने म्हटले. उच्च न्यायालयाने पाणी वाटपावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे.मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (जीएमआयडीसी) घेण्यापूर्वी राज्य जलनियामक प्राधिकरणाने १९ सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्याला किती पाणी सोडायचे, यासंबंधी संपूर्ण माहिती मागवली होती. त्यानंतर १५ आॅक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाचा आदेश ‘जीएमआयडीसी’ला दिला. सोमवारी सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने यासंबंधी प्राधिकरणावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. माहिती मागवली, तर निर्णय घेतलात का? फाईल दाखवा, असे निर्देश खंडपीठाने प्राधिकरणाला दिले. मात्र, अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची फाईल नव्हती, तसेच निर्णय घेतला की नाही, यावर प्राधिकरणाकडे काहीच ठोस उत्तरही नव्हते. त्यावर निर्णय घ्यायचा नव्हता तर माहिती का मागवली? असे शब्दांत खंडपीठाने फटकारले.प्राधिकरणावर ताशेरे ओढताना न्यायालयाने म्हटले की, ‘आमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्राधिकरणाने दिलेले नाही. पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या राज्यातील सर्वोच्च प्राधिकरणाकडून असे घडणे योग्य नाही. प्राधिकरणाकडे तज्ज्ञ मंडळी आहेत.’पाण्याचा प्रश्न पेटला असताना, त्यांनी पाणी वाटपाबाबत तातडीने निर्णय घेणे योग्य ठरले असते. मात्र, त्यांनी केवळ माहिती मागवली. कोणताही निर्णय घेतला नाही. इतका महत्त्वाचा प्रश्न प्राधिकरण गांभीर्याने का घेत नाही?, असे विचारत राज्य सरकारनेच आता या प्रकरणी लक्ष घालावे, अशा शब्दांत खंडपीठाने प्राधिकरणाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. (प्रतिनिधी)