शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच

By admin | Updated: June 11, 2016 01:13 IST

पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच असून, मार्च २०१६मध्ये प्रवाशांची संख्या तब्बल ७० हजारांनी घटली

पुणे : पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच असून, मार्च २०१६मध्ये प्रवाशांची संख्या तब्बल ७० हजारांनी घटली असतानाच; एप्रिल महिन्यातही हा टे्रंड कायम असून प्रवासीसंख्या ४१ हजारांनी घटली आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासीसंख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजांरांवर खाली आली होती. हा आकडा एप्रिल २०१६मध्ये ९ लाख ६९ हजारांवर आला आहे. त्यामुळे एकीकडे अवघ्या दोन महिन्यांत प्रवासीसंख्या तब्बल १ लाख १० हजारांनी घटली असताना; दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असल्याच्या नावाखाली नवीन गाड्या खरेदीचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०५४वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासीसंख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शाळांना असलेल्या सुट्या तसेच इतर कारणास्तव मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत पीएमपीच्या प्रवाशांची संख्या कमी होते. मात्र, या वेळी ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असतानाही ती वाढविण्यासाठी अथवा प्रवासी घटल्याने मार्गावरील गाड्यांचे नियोजन करण्यासाठी पीएमपीकडून कोणतेही विशेष प्रयत्न करण्यात आले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. तर, सद्य:स्थितीत मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी जवळपास १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या ठेकेदारांना समज देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच बस प्रवासी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. >अवघ्या ५९ टक्के बस रस्त्यावर प्रवाशांची संख्या घटण्याबरोबरच पीएमपीच्या ताफ्यात पीएमपी, पीपीपी तत्त्वावरील बस तसेच ठेकेदारांच्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या बसमधील केवळ ५९ टक्केच बस या दोन महिन्यांत रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २१०० बस असून, त्यातील केवळ ११०० बसच या महिन्यांमध्ये रस्त्यांवर उतरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ताफ्यातील बसही पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणण्यात पीएमपीला अपयश येत असून, प्रवाशांना सक्षम सुविधा मिळणे धूसर होत असल्याची टीका मंचाने केली आहे.>मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी सुमरे १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या बस मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहे.