शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच

By admin | Updated: June 11, 2016 01:13 IST

पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच असून, मार्च २०१६मध्ये प्रवाशांची संख्या तब्बल ७० हजारांनी घटली

पुणे : पीएमपीच्या प्रवासीसंख्येतील घट सुरूच असून, मार्च २०१६मध्ये प्रवाशांची संख्या तब्बल ७० हजारांनी घटली असतानाच; एप्रिल महिन्यातही हा टे्रंड कायम असून प्रवासीसंख्या ४१ हजारांनी घटली आहे. फेब्रुवारीत असलेली १० लाख ८० हजार प्रवासीसंख्या मार्च महिन्यात १० लाख १० हजांरांवर खाली आली होती. हा आकडा एप्रिल २०१६मध्ये ९ लाख ६९ हजारांवर आला आहे. त्यामुळे एकीकडे अवघ्या दोन महिन्यांत प्रवासीसंख्या तब्बल १ लाख १० हजारांनी घटली असताना; दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असल्याच्या नावाखाली नवीन गाड्या खरेदीचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २००९ ते २०१५ दरम्यान १० लाखांच्या आसपास राहिली आहे. मात्र, याच कालावधीत बसची संख्या १५११ वरून २०५४वर गेली आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढूनही प्रवासीसंख्येत तेवढ्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, शाळांना असलेल्या सुट्या तसेच इतर कारणास्तव मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत पीएमपीच्या प्रवाशांची संख्या कमी होते. मात्र, या वेळी ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असतानाही ती वाढविण्यासाठी अथवा प्रवासी घटल्याने मार्गावरील गाड्यांचे नियोजन करण्यासाठी पीएमपीकडून कोणतेही विशेष प्रयत्न करण्यात आले नसल्याचे यावरून दिसून येत आहे. तर, सद्य:स्थितीत मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी जवळपास १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या ठेकेदारांना समज देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच बस प्रवासी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. >अवघ्या ५९ टक्के बस रस्त्यावर प्रवाशांची संख्या घटण्याबरोबरच पीएमपीच्या ताफ्यात पीएमपी, पीपीपी तत्त्वावरील बस तसेच ठेकेदारांच्या भाडेकराराने घेण्यात आलेल्या बसमधील केवळ ५९ टक्केच बस या दोन महिन्यांत रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २१०० बस असून, त्यातील केवळ ११०० बसच या महिन्यांमध्ये रस्त्यांवर उतरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ताफ्यातील बसही पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणण्यात पीएमपीला अपयश येत असून, प्रवाशांना सक्षम सुविधा मिळणे धूसर होत असल्याची टीका मंचाने केली आहे.>मार्गावर नसलेल्या ९४८ बसपैकी सुमरे १११ बस या भाडेकरारावरील ठेकेदारांच्या असून, त्या बस मार्गावर नसल्याने प्रतिबस १० हजार रुपयांचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहे.