शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

हे तर घोषणाबाज सरकार!

By admin | Updated: February 7, 2015 02:06 IST

महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा कागदावरच आहे, वीजेवरचे अनुदान बंद केले आहे, कृषीमालाचे भाव घसरलेले आहेत, त्यांना मदतीची घोषणा झाली प्रत्यक्षात हाती काहीच नाही,

मुंबई : महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा कागदावरच आहे, वीजेवरचे अनुदान बंद केले आहे, कृषीमालाचे भाव घसरलेले आहेत, त्यांना मदतीची घोषणा झाली प्रत्यक्षात हाती काहीच नाही, एफआरपीनुसार दर देण्याची घोषणाही हवेत विरली, एलबीटीबाबत या सरकारने घुमजाव केले आहे.त्यामुळे राज्यातील महायुतीचे सरकार केवळ घोषणाबाज सरकार ठरले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकाराव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.प्रदेश काँग्रेसच्यावतीने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ नावाची पुस्तीका शुक्रवारी काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिली आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पळ काढल्याचे सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत झालेली प्रश्नोत्तरे अशी - प्रश्न : तुमच्या पुस्तिकेत उल्लेखलेला काळा पैसा आणि पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा राज्य शासनाशी काय संबंध?ठाकरे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या निवडणुका याच विषयावर जिंकल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत म्हणून यात त्यांचा उल्लेख केला आहे.प्रश्न : राज्यात युती सरकार आल्यानंतर नेमक्या किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? विखे : पुस्तकात आत्महत्येचा आकडा छापलेला नाही मात्र मागील तीन महिन्यात सुमारे ३०० आत्महत्या झाल्या आहेत. एकट्या विदर्भात १७५ आत्महत्या आहेत.प्रश्न : युती सरकारने जलसिंचनाची एसीबीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला आपले समर्थन आहे का?ठाकरे : काही तरी आधार असेल म्हणूनच सरकारने तसे केले असेल. काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न : मागचे मुख्यमंत्री गतिमान निर्णय घ्यायचे की आत्ताचे?ठाकरे : हे सरकार गोंधळलेले आहे. कोणाच्यातरी दबावाखाली हे सरकार निर्णय घेत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर निर्णय घेतले होते. हे सरकार ते देखील करत नाही.प्रश्न : नारायण राणेंनी श्रेष्ठींना पत्र लिहीले आहे. राज्यात सहा सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. त्यावर आपले मत काय?ठाकरे : सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी मतं द्यावीत असे मीच सर्वांना कळवले होते. त्यानुसार राणे यांनी त्यांचे मत कळवले आहे.