शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा धार्मिक स्थळे ३१ डिसेंबरपूर्वी पाडणार

By admin | Updated: November 6, 2016 03:36 IST

राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दींमध्ये, तसेच जिल्ह्यांमध्येही २९ सप्टेंबर २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेली सर्व बेकायदा धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी

- यदु जोशी,  मुंबई

राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दींमध्ये, तसेच जिल्ह्यांमध्येही २९ सप्टेंबर २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेली सर्व बेकायदा धार्मिक स्थळे ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. नगरविकास विभागाने शनिवारी या संबंधीचा आदेश काढला असून, महापालिका क्षेत्रांत महापालिका आयुक्त, तर अन्य ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळे पााण्याची जबाबदारी सोपविली आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी ठरलेल्या मुदतीत या आदेशांचे वेळेत पालन न केल्यास, या अधिकाऱ्यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल खटल्यांना तोंड द्यावे लागणार आहे. अर्थात, २९ नोव्हेंबर २00९ च्या आधीची अवैध धार्मिक स्थळेही पाडण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी वेगळे निकष लावण्यात आले आहेत. सन १९६० ते २९ सप्टेंबर २००९ या या काळात बांधण्यात आलेली बेकायदा धार्मिक स्थळे सरकारच्या लेखी वर्ग ब मध्ये येतात. अशी धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबर २०१७ पूर्वी निष्कासित (ती पाडणे आणि/वा अन्यत्र स्थलांतर करणे) करण्याचे आदेश नगरविकास विभागातर्फे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बेकायदा धार्मिक बांधकामे हटविण्याचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाने या आधीच दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठीच देण्यात आलेला आहे. ही बांधकामे हटविण्यासाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची संपूर्ण जबाबदारी ही स्थानिक महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यांनी या जबाबदारीचे पालन केले नाही, तर त्यांना न्यायालयीन अवमानाच्या खटल्यास सामोरे जावे लागेल, असे नगरविकास विभागाने बजावले आहे.ही बेकायदा धार्मिक स्थळे पाडणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेला स्थानिक पोलीस आयुक्त वा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण संरक्षण द्यावे, असेही बजावण्यात आले आहे. राज्यातील सर्व बेकायदा धार्मिक स्थळांच्या याद्या महापालिकांनी आधीच निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार, ही कारवाई होणार.कोणकोणती बेकायदा धार्मिक स्थळे हटविली, याचा विस्तृत अहवाल राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात येणार आहे. किंबहुना, न्यायालयाने तसे निर्देशच सरकारला दिले आहेत. अडथळे आणू नका ; गुन्हा होईल दाखलबेकायदा धार्मिक स्थळे पाडण्याच्या कामात कोणी कितीही मोठ्या व्यक्तीने अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई होणार.धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामे नव्याने होणार नाहीत, यासाठी राज्य सरकार यंत्रणा उभारणार. अशा बांधकामांबाबत नावाने वा निनावी तक्रार आली, तरीही त्याची तातडीने दखल घेणार.मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील, तसेच मोठ्या शहरांमधील अनधिकृत बेकायदा बांधकामांवर, तसेच धार्मिक स्थळांवर कारवाई होत नसल्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर, न्यायालयाने सरकारला मुदतीचे बंधनच घालून दिले आहे. त्यामुळे सरकारचीही घाई सुरू झाली असल्याचे दिसत आहे.