शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची घोषणा फसवी - हेमंत पाटील

By admin | Updated: July 7, 2017 22:08 IST

शेतक-यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी शुक्रवारी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 -  शेतक-यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी शुक्रवारी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपा सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय सरकारने सुकाणू समितीसोबत केलेला करार शेतक-यांसमोर उघड करण्याची मागणीही हेमंत पाटील यांनी केली आहे.
शेतक-यांचे नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केलेल्या शेतीप्रश्नाचे अभ्यासक श्रीकांत तराळ यांच्यासोबत हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुळात शेतमालाला हमीभाव मिळावा, म्हणून सुरू झालेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी कर्जमाफीचे रूप दिले. सरकारनेही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचे पालन करण्याची घोषणा करत महत्त्वाच्या शिफारसींना बगल दिली. मुळात आतापर्यंत आयोगाच्या ७० टक्के शिफारसींची अंमलबजावणी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र प्रत्यक्षात महत्त्वाच्या असलेल्या ३० टक्के शिफारसींनाच सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. निकषहीन कर्जमाफीची घोषणा केवळ एक पळवाट असल्याचा आरोप तराळ यांनी केला.
तराळ म्हणाले की, शेतकरी नेते शरद जोशी यांनी दिवंगत मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्यासोबत शेतक-यांच्या प्रश्नांवर २० डिसेंबर १९८० साली पहिली वाटाघाटी केली होती. त्यात ऊस, कापूस आणि कांदा या नगदी पिकांना हमीभाव देत अल्प भूधारक शेतक-यांसाठी अंतुले यांनी पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान महमोहन सिंग यांनी केलेली कर्जमाफी सर्वश्रुत आहे. या दोन प्रकारांची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे. तरीही अभ्यासाचे कारण देत सरकार शेतक-यांना कर्जमुक्तीपासून दूर नेत आहे. सुकाणू समितीने केलेल्या करारानंतर केवळ कर्जमाफीची घोषणा झाली. त्यानंतर सरकार सातत्याने नवनवीन अध्यादेश काढत असून शेतक-यांना अद्यापपर्यंत प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही.
न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार!
सुकाणू समितीने सरकारसोबत केलेल्या वाटाघाटीचा करार सर्वसामान्य शेतक-यांसमोर जाहीर करण्याची मागणी यावेळी पाटील यांनी केली. ते म्हणाले की, शेतक-यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती हवी आहे. त्यासाठी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा. सरकारने आयोग लागू केला नाही, तर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.