शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

कर्जमाफीची घोषणा फसवी - हेमंत पाटील

By admin | Updated: July 7, 2017 22:08 IST

शेतक-यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी शुक्रवारी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 -  शेतक-यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेमंत पाटील यांनी शुक्रवारी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपा सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय सरकारने सुकाणू समितीसोबत केलेला करार शेतक-यांसमोर उघड करण्याची मागणीही हेमंत पाटील यांनी केली आहे.
शेतक-यांचे नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केलेल्या शेतीप्रश्नाचे अभ्यासक श्रीकांत तराळ यांच्यासोबत हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुळात शेतमालाला हमीभाव मिळावा, म्हणून सुरू झालेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी कर्जमाफीचे रूप दिले. सरकारनेही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचे पालन करण्याची घोषणा करत महत्त्वाच्या शिफारसींना बगल दिली. मुळात आतापर्यंत आयोगाच्या ७० टक्के शिफारसींची अंमलबजावणी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र प्रत्यक्षात महत्त्वाच्या असलेल्या ३० टक्के शिफारसींनाच सरकारने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे. निकषहीन कर्जमाफीची घोषणा केवळ एक पळवाट असल्याचा आरोप तराळ यांनी केला.
तराळ म्हणाले की, शेतकरी नेते शरद जोशी यांनी दिवंगत मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्यासोबत शेतक-यांच्या प्रश्नांवर २० डिसेंबर १९८० साली पहिली वाटाघाटी केली होती. त्यात ऊस, कापूस आणि कांदा या नगदी पिकांना हमीभाव देत अल्प भूधारक शेतक-यांसाठी अंतुले यांनी पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान महमोहन सिंग यांनी केलेली कर्जमाफी सर्वश्रुत आहे. या दोन प्रकारांची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे. तरीही अभ्यासाचे कारण देत सरकार शेतक-यांना कर्जमुक्तीपासून दूर नेत आहे. सुकाणू समितीने केलेल्या करारानंतर केवळ कर्जमाफीची घोषणा झाली. त्यानंतर सरकार सातत्याने नवनवीन अध्यादेश काढत असून शेतक-यांना अद्यापपर्यंत प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही.
न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार!
सुकाणू समितीने सरकारसोबत केलेल्या वाटाघाटीचा करार सर्वसामान्य शेतक-यांसमोर जाहीर करण्याची मागणी यावेळी पाटील यांनी केली. ते म्हणाले की, शेतक-यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती हवी आहे. त्यासाठी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा. सरकारने आयोग लागू केला नाही, तर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.