शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

राज्यात ‘डीएड’ला उतरती कळा

By admin | Updated: July 22, 2016 20:19 IST

डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर

- विजय सरवदे

औरंगाबाद, दि.22 -  डी.एड. झाल्यानंतरही शिक्षकाची नोकरी मिळेल, याची शास्वती नाही. राज्यात सद्या डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौज बेरोजगारीच्या विळख्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पाठ डी.एड. कॉलेजकडे फिरवली असून शेकडो कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे, यंदा ९ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती; पण लगेच काही संस्था चालकांनी या प्रवेश प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, दोन महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया स्थगित आहे.
सन २०१० पर्यंत डी.एड. कॉलेजेससाठी सुगीचे दिवस होते. डी.एड.ला प्रवेश घेण्यासाठी वारेमाप डोनेशन दिले जायचे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंब्बड उडायची. २०१० नंतर मात्र हे चित्र पालटले. २०१० मध्ये केंद्रीय शिक्षक भरती झाली. त्यानंतर आजपर्यंत पुन्हा कधी शिक्षकांची भरती राबविण्यात आलीच नाही. कधी काळी नोकरीची हमखास हमी असणारे डी.एड. कॉलेजेस आता मात्र बेरोजगारांची फौज तयार करणारे कारखाने झाले आहेत. पूर्वीची डी.एड. व आताची डी.टी.एड. पदविका घेणारे लाखो तरुण सध्या बेरोजगार आहेत. गेल्या वर्षी तर मराठवाड्यातील प्रवेशाच्या ३ हजार जागांपैकी तब्बल दोन हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. अवघे ३० टक्के  झाले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी डी.एड. कॉलेजेसकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यभरातील अनेक अध्यापक पदविका महाविद्यालये दिवसेंदिवसविद्यार्थ्यांनी ओस पडत चालली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८९ डी.एड. कॉलेजेसपैकी ५० टक्के कॉलेजेस अर्थात ४२ कॉलेजेस सध्या तग धरुन आहेत. 
राज्यात ११०० डी.एड. कॉलेजेस होती. त्यापैकी १९ शासकीय अध्यापक पदविका महाविद्यालय, तर १०० ते १२५ अनुदानित महाविद्यालये आहेत. उर्वरित ७०० ते ८०० विना अनुदानित डी.एड. महाविद्यलयांपैकी ५० टक्केच्या वर महाविद्यालये चालविणे शक्य नसल्यामुळे संस्थाचालकांनी आपली महाविद्यालयेच बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. भोपाळ येथील ‘एनसीईटी’ याच संस्थेला डी.एड. महाविद्यालय सुरू करण्याचे आणि बंद करण्याचेही अधिकार आहेत. ‘एनसीईटी’कडून महाविद्यालय बंद करण्यास परवानगी मिळालेली नसल्यामुळे संस्थाचालक आणि तेथे काम करत असलेले एम.एड.धारक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
 
आयडीयल बॅचलाही मिळेना विद्यार्थी

 

जिल्हास्तरीय ‘डायट’ अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ५० विद्यार्थ्यांची एक ‘डीएड आयडीयल’ बॅच असते. अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळतो. तज्ज्ञ शिक्षकांकडून या बॅच मधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते; पण गेल्या तीन वर्षांपासून ‘डायट’ मधील ‘आयडीयल’ बॅचसाठीदेखिल विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे ‘डायट’च्या मनुष्यबळाचा वापर आता जि.प. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वापरले जाणार आहे. राज्यातील जवळपास ३५ ‘डायट’ची सारखीच अवस्था आहे.