शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल रिचार्जचा सोसायट्यांचा निर्णय

By admin | Updated: May 17, 2016 04:13 IST

ठाण्यातील सोसयट्यांनी पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन विविध उपाययोना आखण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे : ठाण्यातील सोसयट्यांनी पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन विविध उपाययोना आखण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून ठाण्यातील तारांगण, वेदांत कॉम्प्लेक्स, विम्बलटेन, निळकंठ हाईट्स, गावंडबाग, लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स या सोसायट्यांनी बोअरवेल रिचार्ज करण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ््याच्या आत हे काम पूर्ण होईल असा विश्वास या सोसायट्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे शहरवासियांनादेखील भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. भविष्यात हा गंभीर प्रश्न उद्भवू नये म्हणून अनेक सोसायट्या आपापल्या स्तरावर उपायोयजना करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे सिटीझन व्हॉईसदेखील पाणी बचतीवर जनजागृती करीत आहे. भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून प्रत्येक सोसायटीने बोअरवेल रिचार्ज करावे असे आवाहन ठाणे सिटीझन व्हॉईसच्या माध्यमातून करण्यात आले. या सोसायटीच्या आवाहनाला ठाण्यातील सहा सोसायट्यांनी प्रतिसाद दिला असून, काही दिवसांतच कामाला सुरुवात करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वच सोसायट्यांनी बोअरवेल रिजार्च करावे म्हणजे भविष्यात पाणी टंचाई उद्भवणार नाही. आमच्या आवाहनाला तारांगण, वेदांत कॉम्प्लेक्स, विम्बलटेन, निळकंठ हाईट्स, गावंडबाग, लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्स या सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ठाणे सिटीझन व्हॉईसचे संस्थापक कॅसबर आॅगस्टीन यांनी लोकमतला सांगितले.असे केले जाणार रिचार्जसोसायट्यांमध्ये असलेल्या बोअरवेलच्या भोवती चार ते सहा फुटांचा खड्डा खणला जाणार आहे. पावसाळ््यात टेरेसवर पडणारे पाणी हे रिचार्जपीटमध्ये साठवले जाईल आणि साठवलेले पाणी फिल्टर करुन ते बोअरवेलमध्ये सोडण्यात येणार आहे. पावसाळ््यानंतर या पाण्याचा वापर करणे सोयीस्कर ठरेल असे आॅगस्टीन यांनी सांगितले.‘लोकमत’चे ‘जलमित्र’ अभियान स्तुत्यलोकमतच्या जलमित्र अभियानाला आमचा निश्चितच पाठिंबा आहे. लोकमतचा हा उपक्रम स्तुत्य आहे. सर्वांनी पाणी वाचविले पाहिजे. पाण्याचा गैरवापर करु नये. पुढच्या वर्षीच्या पाण्याचे नियोजनासाठी आताच धडपड केली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टींगसारख्या प्रकल्पासाठी खर्च येतो पण खर्चापेक्षा त्याचा भविष्यात काय फायदा आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि आतापासूनच याची सुरुवात करायला हवी.- मोहन पुत्रन, चेअरमन, निळकंठ हाईट्स, ठाणे