शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

सुरक्षित प्रवासाकरिता लवकरच निर्णय

By admin | Updated: July 22, 2016 01:41 IST

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांमधील वाहतुकीच्या दृष्टीने गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत धोकादायक बनलेला आहे.

अलिबाग : देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांमधील वाहतुकीच्या दृष्टीने गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत धोकादायक बनलेला आहे. हा महामार्ग विशेष करून पळस्पे (पनवेल) ते इंदापूर या टप्प्यातील महामार्ग वाहतुकीच्या आणि प्रवाशांच्या जीविताच्या दृष्टीने सुरक्षित करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच प्रयत्न सुरू केले असल्याचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या महामार्गाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदार कंपन्यांचे मालक व संचालक तसेच संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची विशेष बैठक २६ जुलै रोजी बोलावली असून या बैठकीत गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेवून तत्काळ अमलात आणणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.गुरुवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे पत्रकारांशी संवाद साधताना रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा व अपघातविषयक सरकारी राष्ट्रीय अहवालात गोवा राष्ट्रीय महामार्गाची प्रवासास धोकादायक अशा सदरात गणना झाली आहे. या महामार्गावरील पळस्पे(पनवेल) ते इंदापूर या टप्प्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर याच टप्प्यात अपघातजन्य ४२ नवीन ठिकाणे निर्माण झाली व त्यापैकी सात ठिकाणी मोठे व गंभीर अपघात झाले. त्यात मोठ्या प्रमाणात मानवी व वित्तीय हानी झाली. परंतु या अपघातांना वाहन चालकाची चूक कारणीभूत नाही तर महामार्गाची धोकादायक परिस्थिती कारणीभूत असल्याचेही निष्पन्न झाल्याचे बुरडे यांच्या यावेळी लक्षात आणून दिले. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या आपल्या कोकण परिक्षेत्राच्या दौऱ्यात आपण जाणीवपूर्वक येणारा गणेशोत्सव विचारात घेवून गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेच्या मुद्यासच प्राधान्य दिल्याचे बुरडे यांनी सांगितले. महाडकडून येताना महामार्गाच्या सद्यस्थितीची पाहणी करुन, महावीर आणि सुप्रिम या दोन्ही महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. अगरवाल व आर. डी. गोवेकर यांना बुधवारी पेण येथे बोलावून घेवून तातडीने प्राथमिक स्तरावरची बैठक घेवून, महामार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपेक्षित सूचना त्यांना दिल्या आहेत. याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतिम निर्णय २६ जुलै रोजी घेतला जाईल, असे बुरडे यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)>कोकण रेल्वे पोलीस दल स्वतंत्र नाहीकोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच आजतागायत स्वतंत्र कोकण रेल्वे पोलीस दल अस्तित्वातच न आल्याने, कोकण रेल्वे मार्गावरील वा त्या संबंधित कोणत्याही गुन्ह्याचा तपास वा आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पोलिसांनाच काम करावे लागते. परिणामी स्थानिक पोलिसांवर अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्या नियमित कामांवर त्याचा विपरित परिणाम कोकण रेल्वे प्रारंभापासूनच झाला आहे. तरी ही पोलिसांची बांधिलकी ही जनसामान्यांशी असल्याने कोकणातील सर्व जिल्हा पोलीस कोकण रेल्वेस सहकार्य करीत आले आहेत. कोकण रेल्वे पोलीस दल अस्तित्वात येईपर्यंत ते काम करतील, अशी भूमिका एका प्रश्नाला उत्तर देताना बुरडे यांनी स्पष्ट केली. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहयोगातून स्वतंत्र कोकण रेल्वे पोलीस दलाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर असून लवकरच त्यात निर्णय अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.>गस्ती नौकांची दुरु स्तीकोकण परिक्षेत्रातील ५१० सागररक्षक दलांच्या माध्यमातून किनारी सागरी सुरक्षा व्यवस्थेकरिता स्थानिक गुप्त माहिती सातत्याने उपलब्ध होत असते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्राप्त सागरी गस्ती नौकांच्या दुरुस्तीची काही काळापूर्वी समस्या होती परंतु विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दुरुस्ती खर्चाकरिता दिलेल्या विशेषाधिकारांमुळे ही समस्या दूर झाली आहे.