शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा फैसला ३० वर्षांनंतरही अनिर्णित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 05:52 IST

सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.

अजित गोगटे,मुंबई- घर क्र. ९८, गुरुवार पेठ, पुणे येथे राहाणाऱ्या रघुनाथ नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा खटला पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचूनही, हा खून नेमका कोणी केला? याचा फैसला देशाची न्यायव्यवस्था ३० वर्षांनंतरही करू शकलेली नाही.या खुनाबद्दल गणेश श्यामराव आणि अविनाश श्यामराव या रघुनाथच्या शेजारी राहाणाऱ्या दोन अंदेकर बंधुंना दोषी ठरवून, त्यांना जन्मठेप ठोठावण्यावरून सर्वोच्च न्यायालयात न्या. प्रफुल्ल चंद्र पंत आणि न्या. रोहिंग्टन फली नरिमन या दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाल्याने, आता हे प्रकरण सुनावणीसाठी तिसऱ्या न्यायाधीशांकडे जाणार आहे. खून झाला, तेव्हा वयाने विशीच्या आसपास असलेल्या या दोन्ही भावांनी आता पन्नाशी पार केली आहे व इतकी वर्षे जामिनावर असलेल्या या दोघांच्या डोक्यावर आणखी काही काळ अनिश्चिततेती टांगती तलवार कायम राहाणार आहे.सार्वजनिक शौचालय आणि नळावरून रघुनाथ आणि अंदेकर या दोन शेजाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ कलगीतुरा सुरू होता. त्यातूनच घरासमोर सुरू झालेल्या भांडणातून गाडीखाना चौकातील राजेश बोर्डिंग हाउसपर्यंत पाठलाग करून आणि तलवार, चाकू, गुप्ती व खुकरी अशा तीक्ष्ण हत्यारांनी नऊ वार करून, १४ आॅक्टोबर १९८६ रोजी भर दुपारी रघुनाथचा खून करण्यात आला होता.रघुनाथची पत्नी शकुंतला हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १५ आरोपींना अटक करून, त्यांच्यावर खुनाचा कटला दाखल केला. त्यात शकुंतला व रघुनाथची त्या वेळी २३ वर्षांची असलेली मुलगी रोहिणी या दोघींनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. मारेकऱ्यांचा या दोघींनी पाठलाग केला होता. ज्याच्या रिक्षातून रोहिणीने जखमी रघुनाथला ससून इस्पितळात नेले, त्या सुरेश चव्हाण याची साक्षही महत्त्वाची होती.पुण्याच्या सत्र न्यायालयाने ११ मे १९८९ रोजी या खटल्याचा निकाल दिला आणि सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याविरुद्ध सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या अपिलाचा निकाल न्या. डी. जी. देशपांडे व न्या. एस. आर. साठे यांच्या खंडपीठाने तब्बल १८ वर्षांनी म्हणजे, २० फेब्रुवारी २००७ रोजी दिला. शामराव अंदेकर, गणेश आणि अविनाश ही त्यांची दोन मुले आणि विजय रामचंद्र यादव या चार आरोपींच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल फिरविला व त्यांना संगनमताने खून केल्याबद्दल (भादंवि कलम ३०२ व ३४) त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.या चौघांनी याविरुद्ध केलेल्या अपिलाचा निकाल गेल्या गुरुवारी लागेपर्यंत श्यामराव व विजय यांचे निधन झाले होते. न्या. पंत यांनी उच्च न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत, गणेश व अविनाश यांची जन्मठेप कायम केली, पण न्या. नरिमन यांना हा निकाल मान्य झाला नाही. त्यामुळे आता दोघांच्या अपिलाची तिसऱ्या न्यायाधीशापुढे सुनावणी होईल व त्यानुसार निर्णय होईल. दोन्ही अंदेकर बंधुंसाठी सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील उमेश आर. लळित यांनी काम पाहिले.>मतभेदाचे कळीचे मुद्देरघुनाथ यास आपण इस्पितळात नेले, असे रोहिणीने साक्षीत सांगितले. मग त्याला रेखा कोळेकर नावाच्या महिलेने दाखल केल्याची नोंद इस्पितळात कशी?रघुनाथला भोसकून मारेकरी पळून गेल्यानंतर, रोहिणी तेथे आली व शकुंतलाही त्या वेळी नव्हती, अशी साक्ष रिक्षावाल्याने दिली, तरी रोहिणी व शकुंतला यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानून त्यांच्या साक्षींवर विश्वास कसा ठेवावा?मारेकऱ्यांनी रघुनाथवर मांडीच्या सांध्यावर (ग्रॉईन) वार करताना आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे रोहिणीने साक्षीत सांगितले, पण उत्तरीय तपासणीत त्या जागेवर कोणतीही जखम आढळून आली नाही.घरासमोरच हल्ला होऊनही घरात न पळता रघुनाथ बाहेर एवढ्या दूरवर कशासाठी पळत गेला?