शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

अडतीचा निर्णय समितीच्या कोर्टात

By admin | Updated: January 16, 2015 06:19 IST

अडत्यांचे कमिशन शेतक-यांकडून वसूल करण्यास खुद्द राज्य सरकारचा विरोध असल्याने याबाबत फेरविचार करण्याकरिता गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत

मुंबई : अडत्यांचे कमिशन शेतक-यांकडून वसूल करण्यास खुद्द राज्य सरकारचा विरोध असल्याने याबाबत फेरविचार करण्याकरिता गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार यांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. अडत न स्वीकारणारे आणखी एक मार्केट स्थापन करा आणि शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचनाही बैठकीत पुढे आली. सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकरी, व्यापारी व माथाडी कामगारांचे नेते व प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधितांनी आपापली बाजू मांडली. मात्र या वेळी किमान १५० ते २०० जण उपस्थित असल्याने सर्व संबंधितांचे दोन ते तीन प्रतिनिधी घेऊन एक समिती स्थापन करावी. ही समिती देशातील वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन तेथील मार्केट कमिटीमधील व्यवहारांचा अभ्यास करील. त्याचबरोबर अांतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी व व्यापारी यांच्यातील व्यवहारांची समितीने माहिती घ्यावी, अशी सूचना माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी केली.अडतीची पद्धत केवळ पंजाबमध्ये असल्याचा दावा बैठकीत शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केला. मात्र गुजरातमध्येही ‘अ‍ॅडव्हान्स’ या शब्दाचा वापर करून अडतीचे व्यवहार होतात. महाराष्ट्रात ‘कमिशन’ या शब्दाच्या वापरामुळे जर वाद होत असतील तर गुजरातचे अनुकरण करण्यास आपली तयारी असल्याचे व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींचे मत होते. राज्य सरकारने अडतीचे व्यवहार होणारे व अडतीचे व्यवहार न होणारे अशी दोन मार्केट स्थापन करावीत, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय उपलब्ध होतील, अशी सूचना व्यापाऱ्यांनी केली.बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत श्ािंदे, नरेंद्र पाटील, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी संजय पानसरे, अशोक हांडे उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)