शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

शेतकऱ्यांना श्रेय देत निर्णय

By admin | Updated: June 4, 2017 00:45 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा ‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तेव्हा ‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टोलावले आणि आज संपकरी शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीशी चर्चा करून कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांना कर्जमाफीचे श्रेय मिळू न देण्याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली. कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करताना विरोधकांच्या मागणीला मुख्यमंत्री झुकल्याचे कोणतेही चित्र समोर येणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेतला हा संदेश या निमित्ताने त्यांनी दिला. कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लगेच जाहीर का केला नाही, चार महिन्यांनी तो अमलात येईल, असे का म्हटले अशी टीका करून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफीचा निर्णय आज घेऊन त्याची उद्यापासून अंमलबजावणी करणे शक्य नसते. म्हणून मी चार महिन्यांचा कालावधी मागून घेतला. वित्त विभागाचे प्रधान सचिव डी.के.जैन हे कर्जमाफी दिलेल्या काही राज्यांमध्ये अभ्यास करून आले. कर्जमाफी दिल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की तसे सांगता येणार नाही. आत्महत्या काही प्रमाणात नक्कीच कमी होतील आणि त्या बंद व्हाव्यात असेच कुणालाही वाटेल पण पूर्वेतिहास तसा नाही. शेतीचा शाश्वत विकास हाच त्यावरील अंतिम पर्याय आहे आणि राज्य सरकार त्यासाठी उपाययोजना करीत आहे.