शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2016 03:02 IST

राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही

पुणे : राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. गणेश कला क्रीडा मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, गटनेते किशोर शिंदे उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, ‘‘जातींचा विचका व्ही. पी. सिंग यांनी केला. उत्तर प्रेदशात ढाब्यावर चहा देतानाही जात विचारली जाते. आपल्याला महाराष्ट्राचा उत्तर प्रेदश, बिहार करायचा का? आतापर्यंत कुठल्याही जातीच्या पुढाऱ्याने जातींचे भले केलेले नाही. निवडणुकांसाठी वापर करून सोडून देतील.’’पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नये म्हणून आंदोलन केले, त्यावेळी मांडवली केल्याचा आरोप झाला. या भिकारड्यांकडून मी विकला जाणार नाही. आमचा जवान शहीद होतोय आणि आमचे निर्माते पाकच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत आहेत. मला यात यश मिळाले म्हणून अनेकांना पोटशूळ झाला असे ‘ए दिल मुश्किल’ प्रकरणावरून झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन-दोनचे प्रभाग असताना नगरसेवकांना काम करता येत नव्हते, एखाद्याने विकासकामाचा प्रस्ताव दिला की दुसरा नगरसेवक त्याला विरोध करायचा. आता ४-४चे प्रभाग केले आहेत. आता चौघे काय कॅरमवर सोंगटी खेळत बसणार का? यातून लोकांच्या हाताला फक्त पावडरच लागेल अशी टीका त्यांनी केली. मोदींच्या घोषणेने झाकोळले भाषणमराठी वृत्तवाहिन्यांसाठी राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मोठी पर्वणी असते. मंगळवारी राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांवर केवळ याचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने ठाकरे यांचे भाषण झाकोळले गेले.मराठी म्हणून अन्याय झालाराज ठाकरे यांनी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा संदर्भ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीचे उदाहरण दिले. मात्र त्या अधिकाऱ्यावर जातीमुळे नव्हे तर मराठी असल्यामुळे अन्याय झाला आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.पक्ष बदलणारे फेरीवालेमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोघा नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याची खिल्ली उडवताना ठाकरे यांनी या पक्षांतर करणाऱ्यांना फेरीवाल्याची उपमा दिली.