शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मोर्चांना घाबरून युतीचा निर्णय

By admin | Updated: November 9, 2016 03:02 IST

राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही

पुणे : राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात मराठा मोर्चे निघत असल्याने घाबरून भाजप-सेना युती झाली आहे. ती राज्याचे भले व्हावे म्हणून तसेच लोकांच्या हितासाठी झालेली नाही अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. गणेश कला क्रीडा मंदिर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, शहराध्यक्ष हेमंत संभूस, अजय शिंदे, गटनेते किशोर शिंदे उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, ‘‘जातींचा विचका व्ही. पी. सिंग यांनी केला. उत्तर प्रेदशात ढाब्यावर चहा देतानाही जात विचारली जाते. आपल्याला महाराष्ट्राचा उत्तर प्रेदश, बिहार करायचा का? आतापर्यंत कुठल्याही जातीच्या पुढाऱ्याने जातींचे भले केलेले नाही. निवडणुकांसाठी वापर करून सोडून देतील.’’पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नये म्हणून आंदोलन केले, त्यावेळी मांडवली केल्याचा आरोप झाला. या भिकारड्यांकडून मी विकला जाणार नाही. आमचा जवान शहीद होतोय आणि आमचे निर्माते पाकच्या कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत आहेत. मला यात यश मिळाले म्हणून अनेकांना पोटशूळ झाला असे ‘ए दिल मुश्किल’ प्रकरणावरून झालेल्या वादावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दोन-दोनचे प्रभाग असताना नगरसेवकांना काम करता येत नव्हते, एखाद्याने विकासकामाचा प्रस्ताव दिला की दुसरा नगरसेवक त्याला विरोध करायचा. आता ४-४चे प्रभाग केले आहेत. आता चौघे काय कॅरमवर सोंगटी खेळत बसणार का? यातून लोकांच्या हाताला फक्त पावडरच लागेल अशी टीका त्यांनी केली. मोदींच्या घोषणेने झाकोळले भाषणमराठी वृत्तवाहिन्यांसाठी राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मोठी पर्वणी असते. मंगळवारी राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांवर केवळ याचीच जोरदार चर्चा सुरू असल्याने ठाकरे यांचे भाषण झाकोळले गेले.मराठी म्हणून अन्याय झालाराज ठाकरे यांनी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचा संदर्भ पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीचे उदाहरण दिले. मात्र त्या अधिकाऱ्यावर जातीमुळे नव्हे तर मराठी असल्यामुळे अन्याय झाला आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.पक्ष बदलणारे फेरीवालेमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोघा नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्याची खिल्ली उडवताना ठाकरे यांनी या पक्षांतर करणाऱ्यांना फेरीवाल्याची उपमा दिली.