शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय

By admin | Updated: July 15, 2017 05:49 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत. शनिवार, १५ जुलै रोजी एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाचा शेवटचा दिवस आहे. १० दिवस मुदतवाढ देऊनही निकाल जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. यंदापासून मुंबई विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिले. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात कामकाज सुरू झाले. या वेळी कुलगुरूंनी निकाल लवकर लागतील, असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण आत्तापर्यंत निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एलएलबीच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ जुलै होती, परंतु ही मुदत १० दिवसांनी वाढविली. तसेच निकाल जाहीर झालेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण ग्राह्य धरावेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली होती.