शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

एलएलबीच्या प्रवेश प्रक्रियेवर आज होणार निर्णय

By admin | Updated: July 15, 2017 05:49 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालामधील दिरंगाईचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहेत. शनिवार, १५ जुलै रोजी एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाचा शेवटचा दिवस आहे. १० दिवस मुदतवाढ देऊनही निकाल जाहीर न झाल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रशेखर ओक यांनी सांगितले. यंदापासून मुंबई विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचे आदेश कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिले. त्यानुसार, मुंबई विद्यापीठात कामकाज सुरू झाले. या वेळी कुलगुरूंनी निकाल लवकर लागतील, असे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण आत्तापर्यंत निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एलएलबीच्या प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ जुलै होती, परंतु ही मुदत १० दिवसांनी वाढविली. तसेच निकाल जाहीर झालेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे सीईटीचे गुण ग्राह्य धरावेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली होती.