शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

By admin | Updated: April 2, 2017 01:29 IST

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे

पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षांना सामोरे जावे लागू शकते,असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पुण्यात केले.वन विभागातर्फे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जावडेकर यांनी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याबाबत सर्व राज्यांशी संवाद साधला. सुमारे २५ राज्यांनी त्यास होकार दर्शविला असून काही राज्यांनी त्यासंदर्भातील निर्णय स्वत:च घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,परीक्षा घेण्यासंदर्भातील कायदा केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. (प्रतिनिधी)