शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

‘पाचवी, आठवी परीक्षांबाबत लवकरच निर्णय’

By admin | Updated: April 2, 2017 01:29 IST

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे

पुणे : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबतचा कायदा केंद्रीय मंत्रीमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षांना सामोरे जावे लागू शकते,असे सूचक वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पुण्यात केले.वन विभागातर्फे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात जावडेकर यांनी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याबाबत सर्व राज्यांशी संवाद साधला. सुमारे २५ राज्यांनी त्यास होकार दर्शविला असून काही राज्यांनी त्यासंदर्भातील निर्णय स्वत:च घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र,परीक्षा घेण्यासंदर्भातील कायदा केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला आहे.त्यावर लवकरच निर्णय होईल.परिणामी येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. (प्रतिनिधी)