शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

केडीएमसीतील २७ गावांचा फैसला ७ मार्चला

By admin | Updated: March 4, 2016 01:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळायची की, ती महापालिकेतच कायम ठेवायची, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळायची की, ती महापालिकेतच कायम ठेवायची, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. याबाबतची पुढील सुनावणी ७ मार्चला होणार असून त्यात गावांचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरुवातीला ही २७ गावे होती. परंतु, महापालिका त्यांना सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याने ती वगळण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने आंदोलन केले. त्यामुळे २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने ही गावे महापालिकेतून वगळली. त्यानंतर, २००६ पासून गावांचे नियोजन एमएमआरडीएकडे आहे. २०१४ मध्ये आघाडी सरकार पायउतार झाल्यावर भाजपा-शिवसेनेची सत्ता आली. भाजपाने प्रथम गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद असावी, असा पवित्रा घेतला. त्यानंतर, ती १ जून २०१५ ला महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे या गावांसह महापालिकेची निवडणूक झाली. दुसरीकडे ही गावे महापालिकेतच असावीत, अशी शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका होती. निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी भाजपाने शिवसेनेशी थेट पंगा घेऊन ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर राज्य सरकारने ७ सप्टेंबरला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. त्यावर, हरकती व सूचना मागविल्या. त्याला निवडणूक आयोगाने चपराक दिली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गावे वगळून निवडणूक घ्यावी किंवा सरकारने काढलेली अधिसूचना रद्द करावी. औरंगाबाद प्रकरणात गावे वगळण्याची सूचना मागे घेतली होती. तोच न्याय २७ गावांबाबत व्हावा, अशी मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही गावे महापालिकेतून वगळावीत की कायम ठेवावीत, याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ मार्चला अपेक्षित आहे. सरकारने यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रही सादर केले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. गावे वगळल्यास सध्याच्या नियोजनातील पालिकेच्या अनेक प्रकल्पांना फटका बसू शकतो.गावे वगळण्याची सरकारची भूमिकासंघर्ष समितीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, न्यायालय काय निकाल देईल. त्यावर तूर्तास भाष्य करणे योग्य नाही. मात्र, ही गावे महापालिकेतून वगळावीत, ही राज्य सरकारची भूमिका असेल. समितीच्या याचिकेवर १६ ला सुनावणी? २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. तिची सुनावणी १६ मार्चला होणे अपेक्षित आहे, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.