शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

केडीएमसीतील २७ गावांचा फैसला ७ मार्चला

By admin | Updated: March 4, 2016 01:47 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळायची की, ती महापालिकेतच कायम ठेवायची, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळायची की, ती महापालिकेतच कायम ठेवायची, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. याबाबतची पुढील सुनावणी ७ मार्चला होणार असून त्यात गावांचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत सुरुवातीला ही २७ गावे होती. परंतु, महापालिका त्यांना सोयीसुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याने ती वगळण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने आंदोलन केले. त्यामुळे २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने ही गावे महापालिकेतून वगळली. त्यानंतर, २००६ पासून गावांचे नियोजन एमएमआरडीएकडे आहे. २०१४ मध्ये आघाडी सरकार पायउतार झाल्यावर भाजपा-शिवसेनेची सत्ता आली. भाजपाने प्रथम गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद असावी, असा पवित्रा घेतला. त्यानंतर, ती १ जून २०१५ ला महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे या गावांसह महापालिकेची निवडणूक झाली. दुसरीकडे ही गावे महापालिकेतच असावीत, अशी शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका होती. निवडणुकीत मतांच्या राजकारणासाठी भाजपाने शिवसेनेशी थेट पंगा घेऊन ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर राज्य सरकारने ७ सप्टेंबरला गावे वगळण्याची अधिसूचना काढली. त्यावर, हरकती व सूचना मागविल्या. त्याला निवडणूक आयोगाने चपराक दिली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गावे वगळून निवडणूक घ्यावी किंवा सरकारने काढलेली अधिसूचना रद्द करावी. औरंगाबाद प्रकरणात गावे वगळण्याची सूचना मागे घेतली होती. तोच न्याय २७ गावांबाबत व्हावा, अशी मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही गावे महापालिकेतून वगळावीत की कायम ठेवावीत, याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ मार्चला अपेक्षित आहे. सरकारने यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रही सादर केले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. गावे वगळल्यास सध्याच्या नियोजनातील पालिकेच्या अनेक प्रकल्पांना फटका बसू शकतो.गावे वगळण्याची सरकारची भूमिकासंघर्ष समितीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, न्यायालय काय निकाल देईल. त्यावर तूर्तास भाष्य करणे योग्य नाही. मात्र, ही गावे महापालिकेतून वगळावीत, ही राज्य सरकारची भूमिका असेल. समितीच्या याचिकेवर १६ ला सुनावणी? २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. तिची सुनावणी १६ मार्चला होणे अपेक्षित आहे, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.