शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

वारसा संवर्धन समिती नेमण्याबाबत निर्णय घ्या !

By admin | Updated: April 23, 2017 02:42 IST

कोल्हापूर जिल्ह्यासाठी वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊनही कुरुंदवाड नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत वारसा संवर्धन

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यासाठी वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊनही कुरुंदवाड नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत वारसा संवर्धन समिती स्थापण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतली. नगर परिषदेच्या या भूमिकेवर संतापत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले.भालचंद्र टॉकीज व अन्य ६ वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करून, त्यासंबंधी वारसा संवर्धन समिती स्थापन करावी व तोपर्यंत भालचंद्र टॉकीजच्या वास्तूमध्ये कोणतेही बदल करू नयेत, असा आदेश राज्य सरकार व कुरुंदवाड नगर परिषदेस द्यावा, अशी मागणी करणारी याचिका कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोकरे व अन्य चौघांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्याद्वारे न्यायालयात दाखल केली.याचिकेनुसार, कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, त्याचे संस्थान अधिपती हे पटवर्धन घराणे होते. त्या पटवर्धन संस्थानिकांनी त्यांच्या कार्यकालामध्ये कला, संस्कृती व खेळास प्रोत्साहनासाठी कृष्णा घाट व त्याच्या परिसरातील वास्तू, विष्णू मंदिर, गणपती मंदिर, भालचंद्र टॉकीज, दर्ग्यामधील भूगंधर्व रेहमत खान यांची समाधी आदी ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहेत, त्यांचे जतन करणे केंद्र सरकारच्या हेरिटेज नियमावलीप्रमाणे बंधनकारक आहे.नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची सुस्थितीतील वास्तू पाडून तेथे शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत त्याला स्थगिती दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)शॉपिंग सेंटरच्या ठरावाला स्थगितीकुरुंदवाड नगर परिषदेने भालचंद्र टॉकीजची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत असतानासुद्धा, ती पाडून त्या जागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत या ठरावास स्थगिती दिली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.