शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीमध्ये कर्जमाफी; महाराष्ट्रात कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 06:29 IST

मद्रास उच्च न्यायालयाने आजच तामिळनाडू सरकारला दिलेल्या आदेशानंतर, आता कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारवरही दबाव वाढत चालला आहे.

यदु जोशी,मुंबई- उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मंगळवारी केलेली घोषणा आणि सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याबाबत, मद्रास उच्च न्यायालयाने आजच तामिळनाडू सरकारला दिलेल्या आदेशानंतर, आता कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारवरही दबाव वाढत चालला आहे. मात्र, कर्जमाफीची घोषणा तत्काळ होण्याची शक्यता दिसत नसून, कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय एकाच वेळी, पण काही महिन्यांनी घेण्याचा विचार सरकार करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, योगी आदित्यनाथ सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन आश्वासनाची पूर्तता केली. यूपीतील ८६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून, त्यासाठी ३0 हजार ७२९ कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे. महाराष्ट्रात ४९ लाख शेतकऱ्यांना पीककर्जाची माफी द्यायची तर ३० हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडेल. याखेरीज १६ लाख २५ हजार सरकारी कर्मचारी आणि ५ लाख ५० हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करायचा तर आणखी साधारणत: १६ हजार कोटी रुपयांचा भार पडेल. सरकारच्या म्हणण्यानुसार हा आकडा २० हजार कोटींचा असेल असे सांगितले जाते. म्हणजेच ४६ ते ५0 हजार कोटी रुपयांचा बोजा राज्याला सहन करावा लागेल. कर्जमाफीचा निर्णय लगेच घेतल्यास सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनाही सरकारवर दबाव आणतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता सातवा वेतन आयोग लागू केल्यास राज्य सरकार शेतकरीविरोधी आणि नोकरशाहीधार्जिणे असल्याची टीका होईल. म्हणून या दोन्ही मागण्या एकाचवेळी मान्य करण्याची सरकारचा विचार असल्याचे म्हटले जाते .एका ज्येष्ठ मंत्र्याने त्यास दुजोारा दिला. विधिमंडळाचे अधिवेशन तीन दिवसांच्या सुटीनंतर बुधवारपासून पुन्हा सुरू होत आहे. कर्जमाफीच्या मागणीवरुन शिवसेना अधिवेशनात पुन्हा आग्रह धरेल आणि संघर्ष यात्रेवरून परतलेले विरोधक अधिक आक्रमक होतील.>उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा.- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुखबदललेल्या धोरणाचा शेतकऱ्यांना जबर फटकाशेतीसाठीची अवजारे व साहित्याची खरेदी शेतकऱ्यांनी आधी स्वत:च्या पैशांतून करायची आणि नंतर सरकार त्याला अनुदान देईल, असे धोरण केंद्र व राज्य सरकारने अवलंबल्यामुळे शेतकऱ्यांना आधी शंभर टक्के रकमेची तजवीज करावी लागत आहे. आधी अनुदानाची रक्कम वगळून इतर रक्कमच शेतकऱ्याला उभारावी लागत होती. गोरगरीब, विशेषत: दलित, आदिवासी शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. त्याविरुद्ध बोलताही येत नाही, अशी व्यथा भाजपाच्या एका मंत्र्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ‘आम्ही राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू’पनवेल : भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली असती तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळ आली नसती, असे सांगत शेतकऱ्यांनो, जीव देऊ नका, कर्जमाफीसाठी आम्ही राज्यकर्त्यांचे जिणे हराम करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षाने काढलेल्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा सांगता समारोप मंगळवारी पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर पार पडला. निव्वळ कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार नाही. कर्जमाफीसोबत या क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कर्जमुक्तीबाबत आम्ही अनुकूल आहोत. फक्त ती कशी आणि कधी द्यायची, याचा विचार सुरू आहे. उत्तर प्रदेशात शब्द पूर्ण केला, महाराष्ट्रातही करणार. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांनी ते भरावे. त्यांच्यासाठी वेगळी योजना लागू केली जाईल.- सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री.