शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने सरकारला लाथा घातल्याने कर्जमाफी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 13, 2017 10:20 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता यावरुन श्रेयवादाची नवीन लढाई सुरु झाली आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावून शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही कर्जमाफी शिवसेनेमुळे शक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेच्या सक्रीय सहभागामुळे सरकारचा गळाच आवळला गेला. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. 
 
शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे असे उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही असा अप्रत्यक्ष इशाराही सरकारला दिला आहे. 
 
आणखी वाचा 
 
कर्जमाफी देताना शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे असा उपरोधिक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या–तोट्याचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!
 
- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्तास थांबले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय असून आम्ही त्यांच्या एकजुटीच्या वज्रमुठीचे मनापासून आणि ‘तत्त्वतः’ अभिनंदन करीत आहोत. पुणतांबा गावातून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रोश केला. संप आणि बंदच्या दणक्यानंतर सरकारने दडपशाहीचे प्रकार केले तरी शेतकरी एक राहिला व हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव ठरला. नव्या ‘घोषणे’नुसार अल्पभूधारकांचे कर्ज तत्काळ माफ झाले आहे व सरसकट कर्जमाफीस ‘तत्त्वतः’ मान्यता देऊन सरकारने स्वतःच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवून घेतला आहे. शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा संपूर्ण सहभाग होता. त्यामुळे आंदोलन तीव्र झाले व ते इतके तीव्र झाले की, जणू सरकारचा गळाच आवळला गेला. शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी एकतर सरसकट कर्जमाफी करा नाहीतर गुदमरून मरा हाच शिवसेनेचा संदेश आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘कॅबिनेट’वर बहिष्कार टाकून हाच इशारा दिला होता. जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्राण असेच घेणार असाल तर तुमच्याशी आमचं जमणार नाही व तुमच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नाही ही आमची रोखठोक भूमिका आहे आणि राहणार. 
 
- आम्ही आता मुख्यमंत्र्यांचे फक्त एकाच गोष्टीसाठी अभिनंदन करीत आहोत ती म्हणजे कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची ‘हमी’ कुणी देईल काय? असा प्रश्न त्यांनी केला नाही. आता ‘कुणी’ याचा अर्थ ‘तत्त्वतः’ शिवसेना व इतर संघटना असाच घ्यायला हवा. आमच्याकडून व शेतकऱ्यांकडून असे कोणतेही हमीपत्र लिहून न घेता मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल हे अभिनंदन आहे. अर्थात सरकारने ही कर्जमाफी मोकळ्या मनाने व दिलदारीने दिलेली नाही. सरकारात राहून रोज याप्रश्नी शिवसेनेने लाथा घातल्याचा हा परिणाम आहे. शिवसेना सरकारात का? या प्रश्नाचेही नेमके उत्तर हेच आहे. शिवसेना सरकारात फक्त खुर्च्या उबवायला बसलेली नाही, तर जे लोक खुर्च्या उबवून अंड्यांची पैदासही करीत नाहीत अशांच्या खुर्च्या हलवायला बसली आहे. अर्थात उद्याची ‘हमी’ काही आम्ही देऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस तत्त्वतः वगैरे मान्यता दिली तशी तत्त्वतः स्थगिती समृद्धी महामार्गास दिली असती तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन तोफांच्या सलामीने केले असते. मुख्यमंत्र्यांनी ती संधी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने द्यावी अशी आम्ही त्यांना ‘तत्त्वतः’ विनंती करीत आहोत. 
 
- सरकारात एखादे काम रेंगाळत ठेवायचे असेल तर आयोग वगैरे नेमून त्यांच्या अहवालावर वर्षानुवर्षे धुळीचे थर साचवले जातात. तसे अनेकदा ‘तत्त्वतः’ या सरकारी शब्दप्रयोगाचे झाले आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ‘तत्त्वतः’ शब्दाच्या रेशमी फासात अडकून पडू नये. नाहीतर विश्वासघात व उपेक्षेच्या भडक्यात सरकार होरपळून निघेल. तत्त्वतः कर्जमाफीचे निकष सरकारने तत्काळ जाहीर करावेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या चारेक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचेही सातबारा कोरे करकरीत व्हावेत. शेतकऱयांच्या मालास हमीभाव मिळावा या मागणीचा रेटा आम्हाला सोडता येणार नाही. या आमच्या मागण्या तत्त्वतः नसून आरपारच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडास पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न झालाच तर गाठ शिवसेनेशीच आहे व शिवसेना आग्या वेताळाच्या भूमिकेत शिरून पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला आमचा तत्त्वतः पाठिंबा आहे, पण लोकांचे, राज्याचे प्रश्न न सोडवता फक्त राजकीय फायद्या-तोटय़ाचेच हिशेब मंत्रालयात चालणार असतील तर ‘हमी’ भावाचे आम्हालाही सांगता येत नाही. शेतकरी आज आनंदात आहे. त्यांचा आनंद द्विगुणित करा. तूर्त तो तत्त्वतः दिवाळी साजरी करील. त्या दिवाळीत विघ्न आणू नका. संप फुटला नाही, शेतकरी मोडला नाही, तर सरकार झुकले हाच या तत्त्वतः दिवाळीचा अर्थ आहे!