शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

‘कर्जमाफी निव्वळ आकड्यांचा खेळ’

By admin | Updated: June 28, 2017 02:23 IST

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार निव्वळ आकड्यांचा खेळ करत आहे. जाचक अटी आणि शर्तींमुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखापर्यंतचे कर्ज असणाऱ्या ८९ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असल्याचे वक्तव्य केले. आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३६ लाखांचा आकडा दिला आहे. राज्य सरकारकडून येणाऱ्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे भाजपाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मध्यावधीसाठी निर्णय -भाजपाच्या गोटातून मध्यावधीची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याची शंका आहे. मध्यावधीची घोषणा झाली तर काँग्रेस त्यासाठी तयार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.संघाची भूमिका शेतकरीविरोधीच -संघ आणि भाजपाची भूमिका कायमच शेतकरीविरोधी राहिली आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी तोडगा नसला तरी तातडीचा उपाय आहे. चार वर्षांची कर्जमाफी घोषितकरून सरकारने दीर्घकालीन उपाय योजावेत, असे चव्हाण यांनी सरसंघचालकांच्या वक्तव्यासंदर्भात सांगितले.