शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा निर्णय हा शेतक-यांच्या एकजुटीचा व संघर्ष यात्रेचा विजय! - अशोक चव्हाण

By admin | Updated: June 24, 2017 18:46 IST

कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे असं अशोक चव्हाण बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई, दि. 24 - कर्जमाफी देणे शक्य नाही असे म्हणणा-या सरकारला आज कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला हा शेतकरी एकजुटीचा आणि विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा विजय आहे असं काँग्रेस खासदार अशोक चव्हाण बोलले आहेत. काँग्रेस पक्षाने रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची ही मागणी कायम आहे. तसेच ही कर्जमाफी देशातील आजतागायची सर्वात मोठी कर्जमाफी आहे असे म्हणणे ही राज्यातील जनतेची दिशाभूल आहे. काँग्रेसच्या केंद्र व राज्य सरकारने  २००८ साली दिलेली कर्जमाफी अजूनही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असं अशोक चव्हाण बोलले आहेत. 
 
 
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार चव्हाण म्हणले की, काँग्रेस पक्षाने सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला होता. विधानसभेत काँग्रेस पक्षाने हा विषय सातत्याने लावून धरला मात्र सरकार कर्जमाफी द्यायला तयार नव्हते त्यामुळे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली त्याला राज्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर शेतक-यांनी पुकारलेल्या ऐतिहासीक संपामुळे सरकारवर दबाव वाढला त्यातच सरकारने काही शेतकरी नेत्यांना हाताशी धरून अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील शेतक-यांनी संप सुरुच ठेवत सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. विरोधी पक्ष आणि राज्यभरातील शेतकरी संघटीत झाल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी आणि विरोधी पक्षांनी ती सरकारकडून खेचून घेतली आहे असं  अशोक चव्हाण बोलले आहेत. 
 
सरकारने १ लाख ५० हजार रूपयांची कर्जमाफी दिली आहे.  त्यामुळे दीड लाखांपेक्षा जास्त कृषीपूरक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या कर्जमाफीचा पूर्ण लाभमिळणार नाही त्यामुळे रकमेची अट न घालता सरसकट सर्व शेतक-यांची कर्ज माफ करावीत ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम आहे. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना २५ हजारांची मदत अत्यल्प आहे ती वाढवावी. आता खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नविन कर्जवाटप सुरु करावे. शेतक-यांना १० हजार रूपये मदत देताना जशा जाचक अटी घातल्या आहेत तशा अटी घालून शेतक-यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवू नये. या सरकारचा पूर्वानुभव चांगला नाही. सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक राहिला आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवेल तसेच कर्जमाफी प्रत्यक्षात मिळत नाही तोवर आपला संघर्ष व सरकारवरील दबाव कायम ठेवेल, असेही अशोक चव्हाण बोलले आहेत.