शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवर विरोधकांची माघार

By admin | Updated: December 15, 2015 04:04 IST

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच

- अतुल कुलकर्णी,  नागपूर

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच आपल्या मागणीवरून माघार घेतली. माघार घेताना सन्माननीय तोडगा काढा असा लटका आग्रह विरोधकांनी धरला आणि अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सफळ शिष्टाई करीत दुसऱ्या आठवड्यात सुरू केले.काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत कामकाजात भाग घ्यायचा की नाही, यावर बरीच चर्चा झाली. कामकाजात सहभागी तर होऊ पण विरोधकांची प्रतिष्ठा राहिली पाहिजे असा तोडगा काढला नाही तर आपली बदनामी होईल असा सूर बैठकीत निघाला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यासह सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावली. आमचा मान राहिला पाहिजे, असा आग्रह विरोधकांनी त्या बैठकीत धरला. शेवटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, असे गिरीश बापट विरोधी पक्षनेत्यांसोबत माध्यमांना जाऊन सांगतील आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर परिषदेत शेतकरी आत्महत्या विषयावर आणि विधानसभेत पुरवणी मागण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू होईल असे ठरले. त्यानुसार कामकाज सुरू झाले.त्यातही विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित राजकारण केले. कितीही भाषणे झाली तरी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळणार नाही यासाठी विधानसभेत दुष्काळावरील चर्चा रात्री उशिरा सुरू होईल असे नियोजन करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. रात्री ७ च्या सुमारास ही चर्चा झाली. वरच्या सभागृहात मात्र विरोधकांचे बहुमत असल्याने पुरवणी मागण्यांवर उद्या चर्चा करू, आधी दुष्काळावर बोलू असे सांगत सभापतींनी दुष्काळावरची चर्चा सुरू केली. मात्र पहिल्या आठवड्यात काँग्रेसने काढलेल्या मोर्चासाठी सभागृह बंद पाडले गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला जायचे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृह बंद पाडले या आरोपाला पुष्टी देणारी आजची कृती होती अशी प्रतिक्रिया नंतर भाजपाच्या नेत्यांनी दिली. नाव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले पण कामे मात्र दोन्ही काँग्रेसनी आपापली उरकून घेतल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होती. दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. चर्चेला उत्तर मिळाल्यानंतरच सरकार सकारात्मक आहे म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट होणार आहे.सगळे कसे शांत शांत- अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत पार पाडले जाणार हे स्पष्ट झाले आणि अधिवेशन परिसर सुस्तावला. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर तर विधान परिषदेत दुष्काळावर चर्चा सुरू झाली. बोलणारे मोजके सदस्य बाहेर पडले.