शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

कर्जमाफीवर विरोधकांची माघार

By admin | Updated: December 15, 2015 04:04 IST

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच

- अतुल कुलकर्णी,  नागपूर

वांझोट्या चर्चेला अर्थ नाही, आधी कर्जमाफीची घोषणा करा, असा आग्रह धरत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचे संपूर्ण आठवड्याचे कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांनीच आपल्या मागणीवरून माघार घेतली. माघार घेताना सन्माननीय तोडगा काढा असा लटका आग्रह विरोधकांनी धरला आणि अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सफळ शिष्टाई करीत दुसऱ्या आठवड्यात सुरू केले.काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत कामकाजात भाग घ्यायचा की नाही, यावर बरीच चर्चा झाली. कामकाजात सहभागी तर होऊ पण विरोधकांची प्रतिष्ठा राहिली पाहिजे असा तोडगा काढला नाही तर आपली बदनामी होईल असा सूर बैठकीत निघाला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यासह सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठक बोलावली. आमचा मान राहिला पाहिजे, असा आग्रह विरोधकांनी त्या बैठकीत धरला. शेवटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, असे गिरीश बापट विरोधी पक्षनेत्यांसोबत माध्यमांना जाऊन सांगतील आणि प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर परिषदेत शेतकरी आत्महत्या विषयावर आणि विधानसभेत पुरवणी मागण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा सुरू होईल असे ठरले. त्यानुसार कामकाज सुरू झाले.त्यातही विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित राजकारण केले. कितीही भाषणे झाली तरी म्हणावी तशी प्रसिद्धी मिळणार नाही यासाठी विधानसभेत दुष्काळावरील चर्चा रात्री उशिरा सुरू होईल असे नियोजन करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले. रात्री ७ च्या सुमारास ही चर्चा झाली. वरच्या सभागृहात मात्र विरोधकांचे बहुमत असल्याने पुरवणी मागण्यांवर उद्या चर्चा करू, आधी दुष्काळावर बोलू असे सांगत सभापतींनी दुष्काळावरची चर्चा सुरू केली. मात्र पहिल्या आठवड्यात काँग्रेसने काढलेल्या मोर्चासाठी सभागृह बंद पाडले गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसाला जायचे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृह बंद पाडले या आरोपाला पुष्टी देणारी आजची कृती होती अशी प्रतिक्रिया नंतर भाजपाच्या नेत्यांनी दिली. नाव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे झाले पण कामे मात्र दोन्ही काँग्रेसनी आपापली उरकून घेतल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होती. दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. चर्चेला उत्तर मिळाल्यानंतरच सरकार सकारात्मक आहे म्हणजे नेमके काय? हे स्पष्ट होणार आहे.सगळे कसे शांत शांत- अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत पार पाडले जाणार हे स्पष्ट झाले आणि अधिवेशन परिसर सुस्तावला. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर तर विधान परिषदेत दुष्काळावर चर्चा सुरू झाली. बोलणारे मोजके सदस्य बाहेर पडले.