शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आधी कर्जमाफी, मगच चर्चा

By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या

मुंबई : संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे तीनदा सभागृह तहकूब करावे लागले. सभागृहाच्या नियमित कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. पावसाअभावी एकीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देता येणार नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट आत्महत्या करण्याची परवानगीच प्रशासनाकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रीतसर आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्यामुळे ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर, राज्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच यवतमाळ जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी आधीच कर्जमाफी देणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सभागृहातील चर्चेला काहीच अर्थ उरला नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन आपली घोषणा मागे घ्यावी. त्यानंतच सभागृहात चर्चा करू. कोरडी चर्चा आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सुरुवातीला १० मिनिटांसाठी तर नंतर अनुक्रमे ४० व १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असला तरी आजच्या कामकाज पत्रिकेत नियम २६० अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा आहे. त्यामुळे तांत्रिक कारणावरून विरोधकांनी नियम २८९ अन्वये मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. दत्त यांना सभापतींची तंबीशेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधान परिषदेत घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकी झडल्या. या गदारोळात काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी सभापतींची परवानगी न घेताच जोरजोरात बोलायला सुरुवात केली. सभापतींनी तटकरेंना बोलण्याची सूचना केल्यावरही दत्त थांबण्यास तयार नव्हते. त्यामुळे सभापती निंबाळकर यांनी दत्त यांना फटकारले.