शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

आधी कर्जमाफी, मगच चर्चा

By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST

संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या

मुंबई : संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या गदारोळामुळे तीनदा सभागृह तहकूब करावे लागले. सभागृहाच्या नियमित कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. पावसाअभावी एकीकडे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देता येणार नसल्याचे सांगून टाकले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता थेट आत्महत्या करण्याची परवानगीच प्रशासनाकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रीतसर आत्महत्येची परवानगी मागितली आहे. त्यामुळे ताबडतोब कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर, राज्यात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच यवतमाळ जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी आधीच कर्जमाफी देणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सभागृहातील चर्चेला काहीच अर्थ उरला नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन आपली घोषणा मागे घ्यावी. त्यानंतच सभागृहात चर्चा करू. कोरडी चर्चा आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले. कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सुरुवातीला १० मिनिटांसाठी तर नंतर अनुक्रमे ४० व १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर असला तरी आजच्या कामकाज पत्रिकेत नियम २६० अन्वये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा आहे. त्यामुळे तांत्रिक कारणावरून विरोधकांनी नियम २८९ अन्वये मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. दत्त यांना सभापतींची तंबीशेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधान परिषदेत घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमकी झडल्या. या गदारोळात काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी सभापतींची परवानगी न घेताच जोरजोरात बोलायला सुरुवात केली. सभापतींनी तटकरेंना बोलण्याची सूचना केल्यावरही दत्त थांबण्यास तयार नव्हते. त्यामुळे सभापती निंबाळकर यांनी दत्त यांना फटकारले.