शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत

By admin | Updated: April 10, 2017 04:43 IST

राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे

मुंबई : राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत, अशी स्थिती करायची आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका विशद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ असा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केला आहे. फडणवीस यांनी या माध्यमातून थेट शेतकऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. या कार्यक्रमाचे आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनी’वरून सोमवारी प्रसारण केले जाणार आहे. कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होईल, पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मांडली. शेती क्षेत्रातील उत्पादन क्षमतेबद्दल खंत व्यक्त करत ते म्हणाले की, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) दलालांची साखळीच संपुष्टात येईलनाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण आहे. फळांवर प्रक्रिया केली, तर त्यांना अधिक भाव मिळेल. राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, महापालिकांनाही शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल. जलयुक्त शिवार ही जनतेची योजना आहे. जनतेच्या सक्रिय सहभागामुळे ही योजना यशस्वी झाली. जर जनतेने यात सहभागच नोंदवला नसता, तर एवढे मोठे परिवर्तन झालेच नसते. या कामांमुळे अनेक ठिकाणी टँकरचीही गरज भासली नाही. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले.सरकार समूहशेतीला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी समूह शेतीसाठी जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी, अशी स्थिती आहे. यात बदल व्हायला हवा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री