शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत

By admin | Updated: April 10, 2017 04:43 IST

राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे

मुंबई : राज्य सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्जमाफीपूर्वी त्यांच्या हितासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ते पुन्हा कर्जच काढू नयेत, अशी स्थिती करायची आहे. त्यासाठी शेती क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका विशद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ असा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केला आहे. फडणवीस यांनी या माध्यमातून थेट शेतकऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. या कार्यक्रमाचे आकाशवाणी व दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनी’वरून सोमवारी प्रसारण केले जाणार आहे. कर्जमाफीमुळे राजकीय फायदा होईल, पण तसा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मांडली. शेती क्षेत्रातील उत्पादन क्षमतेबद्दल खंत व्यक्त करत ते म्हणाले की, उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या मागे आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) दलालांची साखळीच संपुष्टात येईलनाशवंत पिकांना हमीभाव देणे कठीण आहे. फळांवर प्रक्रिया केली, तर त्यांना अधिक भाव मिळेल. राज्य सरकारने भाज्या, फळांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, महापालिकांनाही शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.शेतकरी अशा ठिकाणी जाऊन आपल्या मालाची विक्री करू शकतो. चांगला माल व किफायतशीर दरात भाज्या व फळे मिळत असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. यामुळे दलालांची साखळीच संपुष्टात येईल. जलयुक्त शिवार ही जनतेची योजना आहे. जनतेच्या सक्रिय सहभागामुळे ही योजना यशस्वी झाली. जर जनतेने यात सहभागच नोंदवला नसता, तर एवढे मोठे परिवर्तन झालेच नसते. या कामांमुळे अनेक ठिकाणी टँकरचीही गरज भासली नाही. शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँकेकडे पहिल्यांदाच एक अभिनव प्रकल्प घेऊन गेलो. शेती क्षेत्रात गुंतवणूक झाल्यास नवीन प्रयोग व आधुनिक शेती करण्यास भरपूर वाव असल्याचे ते म्हणाले.सरकार समूहशेतीला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी समूह शेतीसाठी जास्तीत जास्त सवलती व विविध योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेती क्षेत्राचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी, अशी स्थिती आहे. यात बदल व्हायला हवा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री