शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही- उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 25, 2017 14:26 IST

शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 25 - शेतक-यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय हा समाधानकारक नाही. शेतक-यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकमधल्या संवाद यात्रेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शेतक-यांचे 2017पर्यंतचे कर्ज माफ व्हायला हवे, कर्जमाफीचा शेतक-यांना काहीही लाभ झालेला नाही, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी शिवसेनेच्या रेट्यामुळेच मिळाली आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपालाही लक्ष्य केलं आहे. शेतमालाच्या हमीभावासाठी पाठपुरावा करणार आहे. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असला तरी समाधानकारक नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.कर्जमाफीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस सरकारला कोंडीत पकडणा-या शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत केले होते. सत्तेत राहून विरोध कसला करता ? असा प्रश्न आम्हाला विचारण्यात येत होता. पण सत्तेत राहून काय करता येते हे आम्ही दाखवून दिले, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या आग्रहामुळे दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारने जाहीर केली, असंही रावतेंनी सांगितलं होतं. सरकारच्या घोषणेमुळे सर्वसामान्य शेतक-याला फायदा होणार असून सातबारा कोरा होणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केले असून, त्यामुळे 90 टक्के शेतक-यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.