शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

भूसंपादन कायद्यासाठीचा हटवाद टाळता आला असता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 1, 2015 11:14 IST

भूसंपादन विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घरचा आहेर दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - वादग्रस्त भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी या विधेयकासाठी सरकारचा हटवादीपणा व कटुता टाळती आली असती तर बर झाले असते अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर चिमटा काढला आहे. 

मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकावर त्यांची मतं मांडलीत. भूसंपादन विधेयक मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे देशातील शेतकरी व कष्टकरी जनतेचा विजय आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या विधेयकातील काही मुद्दे शेतकरीविरोधी होते, लोकभावनांचा आदर करुन काम करते ते सरकार ख-या अर्थाने कल्याणकारी असते. मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे जनमत बनले व ही भीती खोडून काढण्यात सरकारी यंत्रणाही तोकडी पडले असे त्यांनी म्हटले आहे. याचा फटका बिहार विधानसभेतही बसला असता याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. शेतक-यांना आधार द्या, त्यांच्या आत्महत्या रोखा, त्यांच्या चुली पेटवा, चा-या अभावी तडफडणा-या जनावरांना वाचवा व सत्ता त्यासाठीच राबवा हीच आमच्या 'मन की बात' आहे असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.