शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद

By admin | Updated: January 20, 2017 00:49 IST

थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे.

केंदूर : येथील थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे. या पाण्यावर दोन्ही गावे हक्क दाखवू लागली आहेत. केंदूर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वेळ नदीवरील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी या भागातील पऱ्हाडवाडी, शिळकवाडी, माळीमळा, तवलीबेंद येथील शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार, मंगळवारी (दि. १७) पाणी सोडण्यात आले होते; मात्र पाबळ येथील काही ग्रामस्थांनी येऊन अवघ्या काही वेळातच ते बंद केले. येथील शेतकरी बाळासाहेब साकोरे, शांताराम खुर्पे, ईश्वर गायकवाड, तात्याभाऊ साकोरे, सुदाम ताठे व ग्रामस्थांनी वरिष्ठांची नुकतीच भेट घेतली. त्यानुसार, वरिष्ठ अधिकारी गौतम लोंढे यांनी प्रत्यक्ष येण्याचे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले होते; मात्र आज दिवसभर येथील सुमारे १०० शेतकरी थिटेवाडी बंधाऱ्यावर बसूनही कोणताच अधिकरी तेथे आला नाही.थिटेवाडी बंधाऱ्याचे सुरुवातीला संपूर्ण अधिकार जलसंधारण विभागाकडे देण्यात आले होते; मात्र आता हा संपूर्ण अधिकार चासकमान लघु पाटबंधारे विभागाकडे देण्यात आलेला आहे. याबाबात संबंधित अधिकारी एस. बी. मेमाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, थिटेवाडी बंधाऱ्यातून कालव्यासाठी दोन आवर्तने देण्यात आलेली होती. तसेच, वेळ नदीवरील बंधाऱ्यासाठी एक आवर्तनही देण्यात आलेले होते. त्यामुळे राखीव साठा ही फक्त पिण्यासाठीच ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. या वेळी केदूर परिसरातील वेळ नदीवरील शेतकरी आक्रमक झालेले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठा शिल्लक असूनही पाणी सोडले जात नाही. त्यामुळे अवघे काही बंधारे भरण्यासाठी पाणी मागण्यात येत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, दि. १७ रोजी बंधारे भण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तोंडी पाणी सोडण्याचे आदेश ग्रामस्थांसमोरे कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले होते. त्या वेळी केंदूरच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, अवघ्या काही क्षणांतच पाणी बंद करण्यात आल्यामुळे अधिकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी सोडले गेले नसल्यास आम्हालाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)>प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केंदूर परिसरातील वेळ नदीवर सुमारे ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, सध्या पाचच बंधाऱ्यांच्या लोकांनी मागणी केली असतानाही ते सोडले जात नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, पाणी ४ ते ५ फूट शिल्लक असतानाही सोडले जात नाही. अवघ्या एका फुटाच्या पाण्यावरच सर्वच बंधारे पूर्ण भरले जाणार आहेत.