शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाद

By admin | Updated: January 20, 2017 00:49 IST

थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे.

केंदूर : येथील थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्यावरून केंदूर व पाबळ या दोन गावांत वाद उभा राहिलेला आहे. या पाण्यावर दोन्ही गावे हक्क दाखवू लागली आहेत. केंदूर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वेळ नदीवरील बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी या भागातील पऱ्हाडवाडी, शिळकवाडी, माळीमळा, तवलीबेंद येथील शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार, मंगळवारी (दि. १७) पाणी सोडण्यात आले होते; मात्र पाबळ येथील काही ग्रामस्थांनी येऊन अवघ्या काही वेळातच ते बंद केले. येथील शेतकरी बाळासाहेब साकोरे, शांताराम खुर्पे, ईश्वर गायकवाड, तात्याभाऊ साकोरे, सुदाम ताठे व ग्रामस्थांनी वरिष्ठांची नुकतीच भेट घेतली. त्यानुसार, वरिष्ठ अधिकारी गौतम लोंढे यांनी प्रत्यक्ष येण्याचे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले होते; मात्र आज दिवसभर येथील सुमारे १०० शेतकरी थिटेवाडी बंधाऱ्यावर बसूनही कोणताच अधिकरी तेथे आला नाही.थिटेवाडी बंधाऱ्याचे सुरुवातीला संपूर्ण अधिकार जलसंधारण विभागाकडे देण्यात आले होते; मात्र आता हा संपूर्ण अधिकार चासकमान लघु पाटबंधारे विभागाकडे देण्यात आलेला आहे. याबाबात संबंधित अधिकारी एस. बी. मेमाणे यांच्याकडून माहिती घेतली असता, थिटेवाडी बंधाऱ्यातून कालव्यासाठी दोन आवर्तने देण्यात आलेली होती. तसेच, वेळ नदीवरील बंधाऱ्यासाठी एक आवर्तनही देण्यात आलेले होते. त्यामुळे राखीव साठा ही फक्त पिण्यासाठीच ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. या वेळी केदूर परिसरातील वेळ नदीवरील शेतकरी आक्रमक झालेले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठा शिल्लक असूनही पाणी सोडले जात नाही. त्यामुळे अवघे काही बंधारे भरण्यासाठी पाणी मागण्यात येत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, दि. १७ रोजी बंधारे भण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तोंडी पाणी सोडण्याचे आदेश ग्रामस्थांसमोरे कर्मचाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले होते. त्या वेळी केंदूरच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, अवघ्या काही क्षणांतच पाणी बंद करण्यात आल्यामुळे अधिकच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणी सोडले गेले नसल्यास आम्हालाच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)>प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केंदूर परिसरातील वेळ नदीवर सुमारे ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, प्रत्येक ठिकाणी पाणीवाटप संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, सध्या पाचच बंधाऱ्यांच्या लोकांनी मागणी केली असतानाही ते सोडले जात नाही. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, पाणी ४ ते ५ फूट शिल्लक असतानाही सोडले जात नाही. अवघ्या एका फुटाच्या पाण्यावरच सर्वच बंधारे पूर्ण भरले जाणार आहेत.