शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

खडडयांमुळे महाराष्ट्रात सातपटींनी वाढले मृत्यूचे प्रमाण

By admin | Updated: August 1, 2016 12:35 IST

खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला.  २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. मात्र खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २०१५ मध्ये खड्ड्यांमुळे ३४१६ जणांना आपला प्राण गमवावा लागला. २०१४ मध्ये खडड्यांमुळे ३०३९ मृत्यू झाले होते. 
 
वाहतूक मंत्रालयाच्या रस्ते अपघातासंबंधीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात खड्डयांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सातपटींनी वाढले आहे. या घटनांवरुन रस्ते देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणा कमी पडत असल्याचे  स्पष्ट होते. देशात उत्तरप्रदेशात सर्वाधिक खराब रस्ते आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिथे खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. 
 
ज्या दिल्लीमध्ये शनिवारी दुचाकी खड्डयात फसल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला त्याच दिल्लीमध्ये २०१५मध्ये खड्डयांमुळे दोन मृत्यू झाले. मागच्यावर्षी देशभरात खड्ड्यांमुळे १०,८७६ अपघातांची नोंद झाली. खड्डे, रस्ते अपघाताची सर्व माहिती गोळा करण्याचे प्रभावी माध्यम नसल्यामुळे हा आकडा वाढू शकतो. 
 
अनेक अपघातांची नोंद होत नाही तसेच रस्ते अपघातातील मृत्यूची सखोल चौकशी सुद्धा होत नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. शहरातील पाणी निच-याची व्यवस्था सुधारत नाही तो पर्यंत खड्डे पडतच रहाणार असे सरकारी विभागामध्ये काम करणा-या रस्ते अभियंत्यांनी सांगितले.