शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

खडडयांमुळे महाराष्ट्रात सातपटींनी वाढले मृत्यूचे प्रमाण

By admin | Updated: August 1, 2016 12:35 IST

खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - खड्डे, स्पीड ब्रेकर आणि रस्त्याचे बांधकाम सुरु असल्यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मागच्यावर्षभरात १०,७२७ जणांचा मृत्यू झाला.  २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण थोडे कमी आहे. मात्र खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. २०१५ मध्ये खड्ड्यांमुळे ३४१६ जणांना आपला प्राण गमवावा लागला. २०१४ मध्ये खडड्यांमुळे ३०३९ मृत्यू झाले होते. 
 
वाहतूक मंत्रालयाच्या रस्ते अपघातासंबंधीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात खड्डयांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सातपटींनी वाढले आहे. या घटनांवरुन रस्ते देखभालीची जबाबदारी असलेल्या यंत्रणा कमी पडत असल्याचे  स्पष्ट होते. देशात उत्तरप्रदेशात सर्वाधिक खराब रस्ते आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिथे खड्डयांमुळे मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. 
 
ज्या दिल्लीमध्ये शनिवारी दुचाकी खड्डयात फसल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला त्याच दिल्लीमध्ये २०१५मध्ये खड्डयांमुळे दोन मृत्यू झाले. मागच्यावर्षी देशभरात खड्ड्यांमुळे १०,८७६ अपघातांची नोंद झाली. खड्डे, रस्ते अपघाताची सर्व माहिती गोळा करण्याचे प्रभावी माध्यम नसल्यामुळे हा आकडा वाढू शकतो. 
 
अनेक अपघातांची नोंद होत नाही तसेच रस्ते अपघातातील मृत्यूची सखोल चौकशी सुद्धा होत नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढू शकतो. शहरातील पाणी निच-याची व्यवस्था सुधारत नाही तो पर्यंत खड्डे पडतच रहाणार असे सरकारी विभागामध्ये काम करणा-या रस्ते अभियंत्यांनी सांगितले.