शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

क्रोबाच्या दंशाने सर्पमित्राचा मृत्यू

By admin | Updated: March 1, 2017 09:47 IST

वसईमधील नायगाव परिसरात राहणा-या सर्पमित्राचा कोब्राच्या दंशाने मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 1 - नायगाव परिसरात राहणा-या सर्पमित्राचा कोब्राच्या दंशाने मृत्यू झाला आहे. मोहम्मद अवेझ मिस्त्री असं त्याचं नाव आहे. श्रमसाफल्य इमारतीत साप दिसल्याचं कळल्यानंतर त्याला पकडण्यासाठी अवेझ गेला होता. मात्र कोब्राला पकडत असताना त्याने अवेझच्या हातावर चावा घेतला. यानंतरही अवेझने त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आणि गोणीत भरलं. 
 
अवेझ गोणी पाठिवर घेऊन जात असताना कोब्राने त्याच्या पाठीवरही चावा घेतला. सराईत असलेल्या अवेझने यानंतरही संयम ठेवत त्याला पकडून ठेवलं आणि खाडीत सोडून दिलं. यानंतर अवेझने उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कोब्राच्या दंशाने त्याच्या शरीरात 90 टक्के विष परसलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 
 
अवेझ आठ वर्षाचा असल्यापासून साप पकडत आला आहे. त्याला साप पकडण्याचा छंद होता. एक सराईत सर्पमित्र म्हणून त्याची ओळख झाली होती. त्यामुळेच कुठेही साप दिसला तरी त्याला लगेच फोन येत असे. त्याने अनेक विषारी सापांना पकडून जंगलात सोडलं होतं. विशेष म्हणजे साप पकडण्यासाठी त्याला कोणत्याही हत्याराची गरज भासत नव्हती. दोन महिन्यांपूर्वीही त्याला अशाच प्रकारे साप चावला होता, पण त्यातून तो बचावला होता.