शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

२००६च्या मुंबई स्फोटांतील जखमी पराग सावंतचा ९ वर्षांनी मृत्यू

By admin | Updated: July 7, 2015 10:55 IST

मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ - मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेले सावंत गेल्या ९ वर्षांपासून कोमात होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

११ जुलै रोजी मुंबईतील  लोकल ट्रेनमध्ये एकामागोमाग एक असे साखळी स्फोट झाले होते. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्या जखमींपैकीच एक असलेले पराग सावंत यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. गेल्या ९ वर्षांपासून ते कोमातच होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्यावेली बाँबस्फोट झाला तेव्हा पराग एक चांगलं जीवन जगत होते, त्यांची पत्नी गरोदर होती. मात्र  स्फोटानंतर सावंत कुटुंबियांचे आयुष्यच बदललं. पराग यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला, पण पराग तिला कधीच पाहू शकले नाहीत. त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. 

दरम्यान या दुर्दैवी घटनेला तब्बल नऊ वर्ष उलटून गेल्यावरही या स्फोटातील दोषींना शिक्षा झालेली नाही.