शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

नऊ माकडांचा मृत्यू

By admin | Updated: February 9, 2015 05:41 IST

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी तलावालगतच्या परिसरात शनिवारी १० माकडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती रहिवाशांकडून रेस्किन्क असोसिएशन फॉर वाईल्ड लाइफ वेल्फेअरला मिळाली. त्या वेळी त्यांनी उद्यान प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाला दूरध्वनीहून माहिती दिली. दरम्यानच्या काळात दहा माकाडांपैकी दोन माकडे जखमी अवस्थेत असल्याचेही समजले. शनिवारी सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास उद्यान प्राधिकरणाच्या शोधपथकाने येथे तपास सुरू केला. परंतु या वेळी त्यांना काही आढळून आले नाही. रविवारी पुन्हा शोधकार्य हाती घल्यानंतर नऊ माकडांचे मृतदेह आढळले असून, त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मृत माकडांपैकी काहींच्या शरीरावर जखमा असून, काहींच्या शरीरावर निळ्या खुणा आहेत. महत्त्वाचे म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणाच्या काही अंतरावर खाद्याची पाकिटे, प्लॅस्टिक बॅग आणि जळालेले हातमोजेही आढळून आले आहेत. परिणामी, हे साहित्य आढळलेल्या ठिकाणी माकडांना मारून त्यांचे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)