शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून मावशी-भाचीचा मृत्यू

By admin | Updated: April 29, 2016 06:17 IST

महापालिकेच्या पांडवलेणीजवळील खत प्रकल्पावर कचरावेचक महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या भाचीचा कचऱ्याचा ढिगारा कोसळून त्याखाली दबून बुधवारी मृत्यू झाला.

नाशिक : महापालिकेच्या पांडवलेणीजवळील खत प्रकल्पावर कचरावेचक महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या भाचीचा कचऱ्याचा ढिगारा कोसळून त्याखाली दबून बुधवारी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ढिगारा उपसून मावशी-भाचीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुर्घटनेमुळे खत प्रकल्पावरील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. येथील खत प्रकल्पावर रोज शेकडो टन कचरा वाहून आणला जात असतो. त्याचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून अनेक कचरावेचक येथे येतात. बुधवारी पहाटे कवटेकरवाडी वस्तीतील काही महिला कचऱ्यातील साहित्य वेचण्यासाठी खत प्रकल्पावर गेल्या. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. कचरा गोळा करताना सुमारे पन्नास फूट उंचीच्या एका ढिगाऱ्याचा काही भाग अचानक कोसळला. त्यात एक महिला व दहा वर्षांची मुलगी गाडली गेल्याचे काही युवकांनी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सुदाम डेमसे यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आले तेव्हा खत प्रकल्पावरील कर्मचाऱ्यांना दुर्घटनेची माहिती नव्हती. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढिगाऱ्याखाली गाडली गेलेल्या पूनम बाळू माळी (४०) या मृतावस्थेत सापडल्या. त्यानंतर कोमल बाळासाहेब माळी (८) हिचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)