शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये जिवंत जाळलेल्या वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

By admin | Updated: March 21, 2017 14:22 IST

उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

ऑनलाइन लोकमत
उल्हासनगर, दि. 21 - उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदू रामरख्यानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ते 90 टक्के भाजले होते.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात समोरासमोर वडापावविक्रीचे स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान ‘महालक्ष्मी जम्बो वडापाव’ दुकानदार चंदू रामरख्यानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आले. या घटनेत रामरख्यानी हे 90 टक्के भाजले होते. त्यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, रामरख्यानी यांना जाळण्याचा प्रयत्न करणारा सुरेश आहुजा हा फरार आहे.
 
उल्हासनगर कॅम्प नं. ४, रेल्वे स्टेशनबाहेर रामरख्यानी यांनी दुकान भाड्याने घेऊन वडापाव सेंटर सुरू केले. यापूर्वी सुरेश आहुजा याने हे दुकान भाड्याने घेऊन वडापावचा धंदा केला होता. महालक्ष्मी सेंटरसमोर आहुजा याचे नवीन वडापाव दुकान मंगळवारपासून सुरू होण्याची कुणकुण रामरख्यानी यांना लागली होती. याबाबत, आक्षेप घेतल्याने सुरेश व रामरख्यानी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या रागातून सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आहुजाने बाटलीतून आणलेले पेट्रोल रामरख्यानी यांच्या अंगावर टाकून त्यांना पेटवून दिले.
 
भरदिवसा घडलेल्या या अमानुष घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रामरख्यानी हे ९० टक्के भाजले.  सुरुवातीला त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. आरोपी आहुजा हा फरार झाला आहे.