शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे मृत्यू

By admin | Updated: June 30, 2016 21:17 IST

वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे.

- साथीच्या आजाराचा पहिला बळी

मुंबई : वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांनी विषेश काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेने केली आहे.काविळाचा संसर्ग रोखण्यासाठी दूषित अन्न आणि पाणी पिणे टाळा या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. वडाळा येथील ५ वर्षाच्या मुलाला १३ जून रोजी काविळच्या उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जुन महिन्यात काविळीचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. जुन २०१५ मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. मे २०१६ मध्ये १३५ रुग्ण आढळले होते. गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार जून महिन्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे. जून महिन्यात मलेरियाचे ४८२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, तर मे महिन्यात मलेरियाचे ४२३ संशयित रुग्ण आढळले होते. तर डेंग्यूचे १५३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मे महिन्यात १२९ रुग्ण आढळून आले होते. लेप्टोचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जुन महिन्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळले होते. पावसाळ्यात जागोजागी पाणी साठते, त्यातून चालणे टाळा असे आवाहन कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. गेल्या वर्षी लेप्टोने डोके वर काढले होते, त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्या, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)