शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेल्वेतून पडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: August 3, 2016 02:37 IST

रबाळे ते ऐरोली दरम्यान रेल्वे पटरीलगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आले.

नवी मुंबई : रबाळे ते ऐरोली दरम्यान रेल्वे पटरीलगत दोन मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आले. त्यापैकी एकाची ओळख पटलेली असून दुसऱ्याविषयी पोलिसांना कसलीच माहिती कळलेली नाही. एकाच्या खिशात चिलीम आढळून आल्याने ते गर्दुल्ले असून नशेतच रेल्वेतून पडले असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. रबाळे ते ऐरोली स्थानकादरम्यान ४०/४५ कि.मी. अंतरावर रुळालगतच्या पाण्याच्या चरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, त्याठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले असता, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. यावरून रात्रीच्या वेळी ते रेल्वेतून पडले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले आहेत. यावरून त्यांची ओळख पटली आहे. जगतसिंग किसन सिंग व संतराज यादव अशी त्या दोघा मृतांची नावे असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु असल्याचे वाशी रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद धावडे यांनी सांगितले. हे दोघेही २५ ते २७ वयोगटातले आहेत. दोघांच्याही खिशामध्ये चिलीम आढळून आलेली आहे. यावरून ते गर्दुल्ले असून रात्रीच्या वेळी नशेमध्ये रेल्वेतून पडले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर रेल्वेतून पडल्यानंतर दोघेही रुळालगतच्या चरीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडाले असावेत. सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. (प्रतिनिधी)