शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 22, 2016 03:10 IST

तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले

सुरेश काटे,

तलासरी- तलासरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कपाट घोटाळा , अंगणवाड्यामधील बोअरवेल घोटाळा गाजत असताना तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.अमृत आहार योजनेचा अनियमति येणारा निधी , बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे रिक्त पद, तलासरी ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्राचा अभाव, अंगणवाड्यात कोंदाटलेले वातावरण या सर्वाचा परिणाम या बालकाच्या मृत्यू मागे असून सॅम च्या श्रेणीतील बालकांची कुपोषणाकडे वाटचाल तलासरीत सुरु आहे तलासरी तालुक्यात २०४ अंगणवाड्यातसेच ४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २४८ अंगणवाड्या आहेत या पैकी १९८ अंगणवाड्या शासकीय व ५० अंगणवाड्याया मालकीच्या जागेत चालतात या शासकीय इमारती पैकी १० इमारती मोडकळीस आल्या असून त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे या अंगणवाड्यात ० ते ५ वयोगटातील सर्वेक्षित बालकांची संख्या वीस हजार सहाशे पंचवीस आहे.या बालकांमध्ये ४० बालके ही सॅम ची व ३२८ बालके मॅमची आहेत. ही आकडेवारी आॅगस्ट अखेरची असून मोखाड्यातील बाल मृत्यूने खडबडून जागे झालेल्या शासनाने पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर या १९ सप्टेंबरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणात मॅम च्या बालकांत लक्षणीय वाढ झाली आहे. या अंगणवाड्यातील बालकांची पूर्वी दर तीन महिन्याने आरोग्य तपासणी व्हायची ती आता सहा महिन्याने होते. या तपासणीसाठी तीन आरोग्य पथके तालुक्यात कार्यरत आहेत परतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी तालुक्यात ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्रच नाही. >अमृत आहारला निधी नाही, सेविकांना वेतन नाहीअंगणवाडीस्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात येऊन आठ वेळा योग्य आहार व औषध बालकांना लवकरच देण्यात येणार आहे. अशी माहिती तलासरीच्या प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधीकारी सावंत यांनी सांगितलेअमृत आहार योजनेचा निधी आला नसल्याने बालक माता या आहारा पासून वंचित असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे .मातांच्या हृदयाची घालमेलतलासरी तालुक्यातील बालकांना उपचारासाठी डहाणू येथे घेऊन जावे लागते त्यामुळे उपचारासाठी बालकाला तिथे नेण्यास त्याची माता तयार होत नाही कारण तिला कुटुंबाची काळजी असते. गेली तर ती घरच्या काळजीने उपचार अर्धवट सोडून परत येते. त्यामुळे बालक उपचारा विना राहते पण याचे खापर यंत्रणा बालकाच्या मातेवर फोडते पण बालकाच्या मातेची मानिसकता समजून घेत नाही.कोणत्याच अंगणवाडीमध्ये विद्युतपुरवठा नाही तालुक्यातील कोणत्याच अंगणवाड्यात विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे कोंदट वातावरणात बालक, मातांना आहार घ्यावा लागतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने बालकाची लाहीलाही होते पण वातानुकूलित कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी होणार? बालके कुपोषित राहू नये यासाठी अमृत आहार योजना आहे पण तिचा निधीच वेळेवर येत नसल्याने अमृत आहार योजने पासून बालके वंचित राहतात तलासरी तालुक्यात जून जुलै पासून या योजनेचा निधी आलाच नाही.