शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

तलासरीत ५ महिन्यांत कुपोषित १६ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: September 22, 2016 03:10 IST

तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले

सुरेश काटे,

तलासरी- तलासरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कपाट घोटाळा , अंगणवाड्यामधील बोअरवेल घोटाळा गाजत असताना तलासरी तालुक्यात ० ते ६ वयोगटातील कमी वजनाच्या 16 बालकांचा उपचारा अभावी पाच महिन्यात मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.अमृत आहार योजनेचा अनियमति येणारा निधी , बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे रिक्त पद, तलासरी ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्राचा अभाव, अंगणवाड्यात कोंदाटलेले वातावरण या सर्वाचा परिणाम या बालकाच्या मृत्यू मागे असून सॅम च्या श्रेणीतील बालकांची कुपोषणाकडे वाटचाल तलासरीत सुरु आहे तलासरी तालुक्यात २०४ अंगणवाड्यातसेच ४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण २४८ अंगणवाड्या आहेत या पैकी १९८ अंगणवाड्या शासकीय व ५० अंगणवाड्याया मालकीच्या जागेत चालतात या शासकीय इमारती पैकी १० इमारती मोडकळीस आल्या असून त्यांच्या बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे या अंगणवाड्यात ० ते ५ वयोगटातील सर्वेक्षित बालकांची संख्या वीस हजार सहाशे पंचवीस आहे.या बालकांमध्ये ४० बालके ही सॅम ची व ३२८ बालके मॅमची आहेत. ही आकडेवारी आॅगस्ट अखेरची असून मोखाड्यातील बाल मृत्यूने खडबडून जागे झालेल्या शासनाने पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर या १९ सप्टेंबरपर्यंत केलेल्या सर्वेक्षणात मॅम च्या बालकांत लक्षणीय वाढ झाली आहे. या अंगणवाड्यातील बालकांची पूर्वी दर तीन महिन्याने आरोग्य तपासणी व्हायची ती आता सहा महिन्याने होते. या तपासणीसाठी तीन आरोग्य पथके तालुक्यात कार्यरत आहेत परतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तलासरी तालुक्यात ग्रामीण रु ग्णालयात बाल उपचार केंद्रच नाही. >अमृत आहारला निधी नाही, सेविकांना वेतन नाहीअंगणवाडीस्तरावर बाल विकास केंद्र सुरु करण्यात येऊन आठ वेळा योग्य आहार व औषध बालकांना लवकरच देण्यात येणार आहे. अशी माहिती तलासरीच्या प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधीकारी सावंत यांनी सांगितलेअमृत आहार योजनेचा निधी आला नसल्याने बालक माता या आहारा पासून वंचित असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे .मातांच्या हृदयाची घालमेलतलासरी तालुक्यातील बालकांना उपचारासाठी डहाणू येथे घेऊन जावे लागते त्यामुळे उपचारासाठी बालकाला तिथे नेण्यास त्याची माता तयार होत नाही कारण तिला कुटुंबाची काळजी असते. गेली तर ती घरच्या काळजीने उपचार अर्धवट सोडून परत येते. त्यामुळे बालक उपचारा विना राहते पण याचे खापर यंत्रणा बालकाच्या मातेवर फोडते पण बालकाच्या मातेची मानिसकता समजून घेत नाही.कोणत्याच अंगणवाडीमध्ये विद्युतपुरवठा नाही तालुक्यातील कोणत्याच अंगणवाड्यात विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे कोंदट वातावरणात बालक, मातांना आहार घ्यावा लागतो. उन्हाळ्यात तर उष्णतेने बालकाची लाहीलाही होते पण वातानुकूलित कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कशी होणार? बालके कुपोषित राहू नये यासाठी अमृत आहार योजना आहे पण तिचा निधीच वेळेवर येत नसल्याने अमृत आहार योजने पासून बालके वंचित राहतात तलासरी तालुक्यात जून जुलै पासून या योजनेचा निधी आलाच नाही.