शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

By admin | Updated: June 13, 2016 05:46 IST

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला

नवी दिल्ली / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे. गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३७२ गुणांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५ गुण मिळवत देशाच्या यादीत सोळावा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात मुलींमध्ये पहिली आलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घरचे पाठिशीपालकांच्या पाठिंब्यामुळे चांगले गुण मिळविणे शक्य झाले. बहीण, आई पाठिशी उभ्या राहिल्या. मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग करणार. - प्रिय शहा, मुंबई>पुढचे शिक्षण मुंबईतूनचगेल्या दीड वर्षांपासून अभ्यास करत होतो. आजीचे मोठे पाठबळ मिळाले. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरींग करायचे आहे. आयआयटी मुंबईतूनच पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे.- चिन्मय आवळे, नवी मुंबई