शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये राज्यात प्रिय शहा अव्वल

By admin | Updated: June 13, 2016 05:46 IST

आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला

नवी दिल्ली / मुंबई : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात जेईईचा (अ‍ॅडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला. यात जयपूरचा अमन बंसल याने देशातून तर, मुंबईच्या प्रिय शहा याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबईचा चिन्मय आवळे याने अनुसूचित जाती वर्गात देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.जीईई या स्पर्धा परीक्षेतील निकालाच्या आधारावरच आयआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. या परीक्षेत यमुनानगरचा भावेश धिंग्रा हा देशात दुसरा तर जयपूरचाच कुणाल गोयल हा तिसऱ्या स्थानी राहिला. मुलींमधून कोटाची रिचा सिंग अव्वल आली आहे. गत २२ मे रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेला १ लाख ५५ हजार ९४८ विद्यार्थी बसले होते. त्यातील केवळ ३६ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३७२ गुणांची जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा दोन विभागांत घेण्यात येते. मुंबईच्या प्रिय शहाने २८५ गुण मिळवत देशाच्या यादीत सोळावा क्रमांक पटकावला आहे. तर राज्यात मुलींमध्ये पहिली आलेली डिंपल कोचर देशात २९५व्या क्रमांकावर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>घरचे पाठिशीपालकांच्या पाठिंब्यामुळे चांगले गुण मिळविणे शक्य झाले. बहीण, आई पाठिशी उभ्या राहिल्या. मुंबईत कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग करणार. - प्रिय शहा, मुंबई>पुढचे शिक्षण मुंबईतूनचगेल्या दीड वर्षांपासून अभ्यास करत होतो. आजीचे मोठे पाठबळ मिळाले. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरींग करायचे आहे. आयआयटी मुंबईतूनच पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे.- चिन्मय आवळे, नवी मुंबई