शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २६ तासांनी सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:06 IST

भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला.

शिरसगाव काटा : येथील भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला. वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील शेतकरी नंदकुमार मल्हारी शेलार (वय ४०) हे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीमा नदीपात्रातील मोटर असलेल्या पाईपला अडकलेला कचरा काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. या वेळी त्यांनी पाण्यात उडी मारली; परंतु जलपर्णीत अडकल्याने पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री मृतदेह न सापडल्याने सकाळी ९ पासून पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली.भीमा नदीच्या सर्वच पात्राला जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे. ज्या ठिकाणी तरुण बुडाला होता, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन होड्यांच्या साह्याने पाण्यात उतरून शोध घ्यायचा प्रयत्न केला. या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती हटविणे गरजेचे असल्याने स्थानिक भिल्ल समाजाचे तरुण व मांडवगण फराटा येथील युवकांनी एकत्र येऊन जलपर्णी थोडी-थोडी हटविण्याचा निर्णय घेतला. पाण्याची दुर्गंधी, अतिशय खराब पाणी व जलपर्णी ही शोधमोहिमेत अडथळा ठरत होती. विविध जाळ्यांच्या साह्याने जलपर्णी हटवली. अरुण खोमणे या युवकाने पाण्यात बुडी मारली असता त्याला मृतदेह दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण ग्रुपचे आबासाहेब जगदाळे, विक्रम जमादार, अंकुश आंबेकर आदींनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार राजेंद्र पोळ हे उपस्थित होते.>१३ तास अथकपणे शोधभीमा नदीतील जलपर्णी धोकादायक असूनही तरुणांनी जिवाची पर्वा न करता दोन दिवसांत सुमारे १३ तास पाण्यात शोध घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला. याकामी अग्निशामक दलाच्या जवानांनीदेखील मदत केली व अखेर स्थानिक युवकांच्याच प्रयत्नांना यश आले अन् मृतदेह हाती लागला.